वाडा एसटी आगाराचे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष

Share

वसंत भोईर

वाडा : दळणवळणाची साधने असली तर ग्रामीण भागाचा विकास होण्यास वेळ लागत नाही. याच कारणास्तव वाडा या आदिवासी, ग्रामीण तालुक्याच्या मुख्यालयी २५ वर्षांपूर्वी (१९९६) वाडा बस आगार सुरू करण्यात आले. तालुक्यातील ग्रामीण भागात बससेवा सुरू करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या बस आगाराचा सध्या उलटा प्रवास सुरू झाला आहे. उत्पन्नाचे कारण पुढे करून ग्रामीण भागात जाणाऱ्या ७० टक्के बसफेऱ्या बंद करून त्या भिवंडी, कल्याण, ठाणे, पुण्याकडे सुरू करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागाकडे एसटी बस आगाराने केलेल्या या दुर्लक्षाबाबत प्रवासी व ग्रामीण नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

ग्रामीण भागातील जनतेला बस सेवेची सेवा मिळावी यासाठी सन १९९६ मध्ये तत्कालीन शिवसेना-भाजपा युती सरकारमधील तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत वाडा बस आगाराचे उद्घाटन करण्यात आले. तालुक्यातील रस्त्यांची सुविधा असलेल्या बहुतांशी गावात बसेवा सुरू झाली. प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असल्याने काही गावांमध्ये दररोज सात ते आठ बसफेऱ्या जाऊ लागल्या. तब्बल १६ ते १७ वर्षे येथील ग्रामीण भागातील प्रवाशांना एसटी बसची चांगली सुविधा मिळाली. विशेषतः ग्रामीण भागातून तालुका मुख्यालयी असलेल्या माध्यमिक शाळा व महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटीची सुविधा फारच फायदेशीर ठरली.

दरम्यान, सध्या वाडा आगाराने हळूहळू ग्रामीण भागातील बसफेऱ्या कमी करून भिवंडी, ठाणे, कल्याण, पुणे, नगरकडे जाणाऱ्या फेऱ्यांकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली. त्यामुळे ग्रामीण भागात खासगी, बेकायदेशीर प्रवासी वाहतूक वाढीस लागली. मार्च २०२० पासून कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासून येथील एसटी बस आगाराने ग्रामीण भागातील बससेवा पूर्णत: बंद केली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने येथील एसटी बस आगाराने शहरी भागातील बससेवा पूर्ववत सुरू केली, मात्र ग्रामीण भागातील ७० टक्के बसफेऱ्या आजही बंदच ठेवल्या आहेत.

ग्रामीण भागातून उत्पन्न (भारनियमन) मिळत नाही, म्हणून येथील ७० टक्के बसफेऱ्या बंद केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याचवेळी या तालुक्यातील ग्रामीण भागातील बस सेवा बंद झाल्याने मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या एसटी महामंडळाच्या ब्रीद वाक्यालाच वाडा आगाराने हरताळ फासल्याने येथील प्रवाशांना नाईलाजाने खासगी प्रवासी वाहतुकीकडे वळावे
लागले आहे.

खासगी प्रवासी वाहतुकीला उधाण

ग्रामीण भागातील ७० टक्के बसफेऱ्या बंद केल्याने तालुक्यातील वाडा-कुडूस, कुडूस-अंबाडी, कुडूस-खानिवली-कंचाड, वाडा-परळी, वाडा-सोनाळे, शिरीषपाडा-अघई या ठिकाणी आठशेहून अधिक जीप, मिनिडोअरमधून बेकायदेशीर प्रवासी वाहतूक सुरू आहे. एसटीच्या बसफेऱ्या बंद केल्याने तालुक्यातील दोन हजारांहून अधिक विद्यार्थी खासगी वाहनांनी प्रवास करताना दिसत आहेत.

Recent Posts

टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्ब ठेवल्याची धमकी

मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…

7 minutes ago

Best Bus fare Hike: नॉन-एसी आणि एसी बससाठी आजपासून मोजावे लागणार इतके पैसे

बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…

11 minutes ago

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

24 minutes ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

44 minutes ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

1 hour ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

1 hour ago