World Cup 2023: सगळं काही विसरा, वर्ल्डकपवर लक्ष द्या…

Share

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा(Indian cricket team) कर्णधार रोहित शर्माने(rohit sharma) आयसीसी क्रिकेट विश्वचषकाआधी मोठे विधान केले आहे. कॅप्टन डेच्या निमित्ताने रोहितने सांगितले की आता ही वेळ आपले लक्ष्य केंद्रित करण्याची आहे. टीम इंडियासमोर सगळ्यात मोठे आव्हान हे आपल्या घरातच वर्ल्डकप जिंकणे हे आहे.

भारतीय संघाने दोन वेळा विश्वचषक जिंकला आहे. भारतीय संघाच्या नजरा तिसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकण्यावर असतील. आयसीसीच्या १३व्या वनडे वर्ल्डकपचे आयोजन ५ ऑक्टोबरपासून होत आहे. स्पर्धेत १० संघ भाग घेणार आहेत. ४६ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत ४८ सामने खेळवले जातील.

भारताने २०११मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात वनडे वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर २०१५मध्ये ऑस्ट्रेलिया आणि २०१९मध्ये इंग्लंडने आपल्या धरतीवर खिताब जिंकला होता. आता भारतीय संघ आपल्या मायभूमीत खिताब जिंकण्यासाठी प्रयत्न करेल. रोहित शर्माचा हा शेवटचा वनडे वर्ल्डकप असू शकतो.

सर्वकाही विसरून लक्ष केंद्रित करण्याची गरज

रोहितने आयसीसीकडून अहमदाबाद येथे आयोजित कॅप्टन डेच्या निमित्ताने सांगितले, मला माहीत आहे की काय पणाला लागले आहे. जे खेळाडू संघाचा भाग आहेत त्यांनाही ही माहिती आहे की काय पणाला लागले आहे ते. आमच्यासाठी आता सर्व काही विसरून आपल्या लक्ष्यावर ध्यान केंद्रित करण्याची गरज आहे. रोहितच्या मते संघाने एकावेळेस एका सामन्यावर लक्ष केंद्रित करावे कारण वर्ल्डकपची स्पर्धा ही लांबलचक आहे.

मोठ्या अवधीत चालणारी स्पर्धा

रोहित पुढे म्हणाला, गेल्या तीन विश्वचषकात यजमान देशाने खिताब जिंकला आहे. मोठ्या कालावधीत चालणारी ही स्पर्धा आहे. त्यामुळे एकदम पुढचा विचार करून चालणार नाही. आमच्यासाठी हे महत्त्वाचे आहे की आम्ही प्रयत्न करावा आणि आपल्या लक्ष्यावर ध्यान केंद्रित करावे.

Recent Posts

IPL 2024 Playoffs: हंगामातील ५० सामने पूर्ण, ५ संघांचे नशीब इतरांच्या हाती

मुंबई: आयपीएल २०२४मध्ये(ipl 2024) गुरूवारी ५०वा सामना खेळवण्यात आला. हा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स…

2 hours ago

Loksabha Election 2024: रायबरेली येथून राहुल गांधी, अमेठीमधून केएल शर्मा उमेदवार, काँग्रेसची घोषणा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारांची घोषणा अखेर करण्याती आली…

3 hours ago

घाबरू नका! फोन चोरी झाल्यास Paytm आणि Google Pay असे करा डिलीट

मुंबई: आजकाल प्रत्येक कामे ही मोबाईलनेच केली जातात. विचार करा की जर तुमच्याकडे फोन नसेल…

3 hours ago

Dream: नशीब बदलतील स्वप्नात दिसलेल्या या ३ गोष्टी

मुंबई: स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात काही गोष्टी दिसणे शुभ मानले जाते. यामुळे व्यक्ती नेहमी आनंदी जीवन जगतो.…

4 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दिनांक ३ मे २०२४.

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण दशमी शके १९४६.चंद्र नक्षत्र शततारका. योग ब्रम्हा. चंद्र राशी कुंभ…

6 hours ago

विकासकामांच्या पाठबळावर मोदींचे विरोधकांना प्रत्युत्तर

देशामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे दोन टप्पे पार पडले असून येत्या ७ मे रोजी निवडणुकीच्या तिसऱ्या…

9 hours ago