Rise in Price of Veggies : गारपिटीमुळे भाज्यांचे नुकसान; आवक कमी झाल्याने भाज्या महागल्या

Share

शेतकर्‍यासह सामान्य माणूस चिंतेत; जाणून घ्या भाज्यांचे दर

मुंबई : यंदाच्या वर्षी वातावरणात झालेल्या बदलांमुळे (Changes in Weather) शेतकर्‍याला (Farmers) प्रचंड नुकसान (Loss) सहन करावे लागले आहे. अवकाळी पावसामुळे पिके वाहून गेली तर काही ठिकाणी पिकांवर रोग पडला, बुरशी धरली. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला. त्यातच राज्यभरात काही ठिकाणी गारपीट झाली. विदर्भाला याचा मोठा फटका बसला. या खराब हवामानामुळे भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक कमी झाली आहे.

कमी भाज्यांच्या उत्पादनामुळे भाज्या महागल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांच्या नुकसानासह सामान्यांच्या खिशालाही कात्री बसणार आहे. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुधीभोपळा, फ्लॉवर आणि मिरचीसह अनेक पालेभाज्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे.

बाजार समितीमध्ये काल राज्याच्या विविध भागांतून आणि परराज्यांमधून ६५५ वाहनांतून ३००० टन भाजीपाल्याची आवक झाली. दुधीभोपळ्याची किंमत दर किलोमागे ११ ते १५ रुपयांवरुन २८ ते ४० रुपयांवर गेले आहेत. फ्लॉवरचा दर ८ ते १० रुपयांवरुन १० ते १४ रुपयांवर गेला आहे. याशिवाय हिरव्या मिरचीसह पालेभाज्यांचेही दर वधारले आहेत.

भाज्यांच्या दरांत अशी वाढ झाली आहे :-

  • दुधीभोपळा – आधीचा दर ११ ते १५ रुपये किलो, आताचा दर २८ ते ४० रुपये किलो
  • फ्लॉवर – आधीचा दर ८ ते १० रुपये किलो, आताचा दर १० ते १४ रुपये किलो
  • कारले – आधीचा दर १० ते १५ रुपये किलो, आताचा दर १४ ते २२ रुपये किलो
  • ढोबळी मिरची – आधीचा दर २० ते २४ रुपये किलो, आताचा दर २५ ते २८ रुपये किलो
  • फ्लॉवर – आधीचा दर ८ ते १० रुपये किलो, आताचा दर १० ते १४ रुपये किलो
  • हिरवी मिरची – आधीचा दर ३४ ते ४० रुपये किलो, आताचा दर १६ ते ८० रुपये किलो
  • कोथिंबीर – आधीचा दर १० ते १५ रुपये जुडी, आताचा दर ६ ते २८ रुपये जुडी
  • मेथी – आधीचा दर १० ते १५ रुपये जुडी, आताचा दर ७ ते २२ रुपये जुडी

हे दर घाऊक बाजारातील असून साध्या बाजारात गेल्यास सध्या तरी या स्वस्त किमतीत भाज्या मिळत नाहीत. यापेक्षा अधिक किंमतीने भाज्या विकल्या जात आहेत.

Recent Posts

लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू हा अपघातच!

जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश! मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणा-या लोकल…

33 mins ago

Bomb Threat : दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार

पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आल्याने खळबळ मुंबई : बसमधून प्रवास करत असताना दोन लोक दादर…

52 mins ago

UPSC : युपीएससी परीक्षार्थींना दररोज ३००० रुपये देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली : स्पर्धा परीक्षांमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तरुणाईमध्ये मोठी चढाओढ सुरु असते. विद्यार्थी रात्रंदिवस…

2 hours ago

नरेंद्र मोदीच हॅटट्रिक करणार! पहिल्या १०० दिवसांचा रोडमॅप तयार

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार असला तरी आपण तिस-यांदा सत्तेत…

2 hours ago

Yogi Adityanath : मोदी तिस-यांदा पंतप्रधान होतील आणि पाकव्याप्त काश्मीर सहा महिन्यांत भारताचा भाग असेल

योगी आदित्यनाथ यांचा ठाम विश्वास पालघर : महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका पार पडणार असून…

5 hours ago

निवडणुकीआधी काश्मिरात दहशतवाद्यांचा उच्छाद! दोन दहशतवादी हल्ले; भाजपाच्या माजी सरपंचाची हत्या

जम्मू : देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) वातावरण आहे. परंतु, काश्मिरात दहशतवाद्यांचा उच्छाद सुरु…

5 hours ago