राज्यात मनसुख हिरेन, सुशांत सिंग प्रकरणाची पुनरावृत्ती

Share

“जितेंद्र आव्हाडांच्या बॉडीगार्डची आत्महत्या नव्हे, खून झालाय”

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या बॉडीगार्डने आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या नसून खून आहे, असा आरोप आता भाजपा नेते मोहित कंबोज यांनी केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांचा अंगरक्षक आणि मुंबई राखीव पोलीस दलातील कर्मचारी वैभव कदम याने आत्महत्या केली आहे. मात्र ही हत्या असल्याचा आरोप कंबोज यांनी केला आहे. करमुसे प्रकरणात आधी आरोपी असणारा आणि आता माफीचा साक्षीदार बनायची तयारी दर्शवलेल्या वैभव कदमचा मृतदेह सापडल्याने कंबोज यांनी शंका व्यक्त केली आहे.

कदम हा जितेंद्र आव्हाडांचा सुरक्षारक्षक होता. एवढ्या मोठ्या हायप्रोफाईल प्रकरणातल्या आरोपीचा असा संशयास्पद मृत्यू होतो. राज्यात अजून एक मनसुख हिरेन आणि सुशांत सिंग राजपूत सारखे प्रकरण झालेय, असा आरोप कंबोज यांनी केला आहे.

माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे, वैभव कदम प्रकरणी तात्काळ एफआयआर नोंदवावा, आमचे रक्षण करणारे पोलीस सुरक्षित नाहीत किंवा त्यांना न्याय मिळणार नसेल तर जनतेचे काय? असा सवालही कंबोज यांनी केला आहे.

या प्रकरणात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून तात्काळ कारवाई करण्याची मागणी कंबोज यांनी केली आहे.

Recent Posts

Mihir kotecha : लोकसभेच्या गेटबाहेर गुटखा विकणारा खासदार पाठवायचाय की तुमचा सेवक पाठवायचाय?

कालच्या राड्याप्रकरणी मिहिर कोटेचा यांचा मुंबईकरांना सवाल मविआच्या २५-३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; ५ जण पोलिसांच्या…

6 mins ago

Kolhapur news : मुलाला वाचवताना तिघांचा नदीत बुडून मृत्यू! कोल्हापुरात घडली भीषण दुर्घटना

हसन मुश्रीफांनी घटनेची दखल घेत तातडीने आर्थिक मदत करण्याच्या दिल्या सूचना कोल्हापूर : कोल्हापुरातून (Kolhapur)…

1 hour ago

Gurucharan Singh : गेल्या २५ दिवसांपासून बेपत्ता गुरुचरण सिंग अखेर घरी परतले!

कारण सांगताच घरचेही अवाक नवी दिल्ली : 'तारक मेहता का अलटा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतून…

2 hours ago

Ipl 2024: मुंबई इंडियन्सच्या नावावर या लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद

मुंबई: लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४मधील(ipl 2024) ६७व्या सामन्यात हरवले. लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी…

3 hours ago

३६५ दिवस चालणार Jioचा हा नवा प्लान, अनलिमिटेड कॉलिंगसोबत फ्री मिळणार FanCode

मुंबई: रिलायन्स जिओकडे(reliance jio) सध्या यावेळे ४६ कोटींपेक्षा अधिक लोकांचा कस्टमर बेस आहे आणि आता…

4 hours ago

सेकंड हँड मोबाईल खरेदी करताय तर घ्या ही काळजी, नाहीतर होईल मोठे नुकसान

मुंबई: स्मार्टफोन्सच्या किंमती बऱ्याच वाढल्या आहेत. आधी जो रेडमी नोट सीरिजमधील फोन १० ते १५…

5 hours ago