जळगाव जिल्हयात यंदाही कापसाची विक्रमी पेरणी !

Share

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हयात आतापर्यंत ९२ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून सर्वात जास्त ५ लाख ५० हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात सर्वात जास्त कापूस लागवडीचा जिल्हा जळगावच राहणार आहे. दरम्यान, आज पावसाने उघडीप दिली असल्याने पाच दिवसानंतर सूर्य दर्शन झाले. याचा पिकांना लाभ होईल. शेतक-यांसाठी बफर्स स्टॉकमधून युरिया व डीएपी ही खते वितरित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कृषि विभागाला दिले असल्याची माहिती जिल्हा कृषि अधीक्षक संभाजीराव ठाकूर यांनी दिली.

जळगाव जिल्हयाचे लागवडी लायक क्षेत्र ८ लाख ४८ हजार ३०० हेक्टर असून खरीप पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ६६ हजार ९२८ हेक्टर आहे. गेल्या खरीप हंगामात जिल्हयात ५ लाख ३७ हजार ३३७ हेक्टरमध्ये कापसाची लागवड झाली होती. यंदा यात वाढ होऊन यंदा ५ लाख ५० हजार हेक्टरमध्ये कापसाची लागवड होत आहे. त्यामुळे यंदादेखील राज्यात सर्वात जास्त कापूस लागवड जिल्हा म्हणजे जळगावचा समावेश होईल, असा दावा केला जात आहे.

कापसाच्या वाढत्या लागवडीमुळे जिल्हयात यंदा ज्वारी, बाजरी, मका व अन्य तृणधान्य यांच्या खरीप क्षेत्रात देखील २५ टक्के घट झालेली आहे, त्याचबरोबर कडधान्य पेरणीत देखील २४ टक्के घट आहे. चाळीस वर्षापूर्वी जळगाव जिल्हयात सर्वात जास्त तेलबियांची लागवड होत असे. आज तेलबियांचे क्षेत्र नगण्य झाले असून आज जिल्हयातील शेतकरी नगदी पिक असलेल्या कापूस लागवडीकडे वळला आहे. त्यामुळे राज्यात सर्वात जास्त कापूस लागवड ही जळगाव जिल्हयात झाली आहे. आज जिल्हयात कापसावर प्रक्रीया करणा-या ११० वर जिनिंग प्रेस असून त्यांची ८०० कोटींची उलाढाल आहे. जिल्हयाचे कापसाचे संपूर्ण अर्थकारण तीन हजार कोटींचे असण्याचे सांगण्यात येते. मध्यंतरीच्या काळात जिल्हयात साखर कारखानदारीमुळे उसाचे क्षेत्र वाढले होते. मात्र जिल्हयातील साखर कारखाने बंद पडल्याने उसाचे क्षेत्रदेखील मोठया प्रमाणावर घटले आहे.

जिल्हयात पाच लाख ५० हजार हेक्टरमध्ये होणारी कापूस लागवड लक्षात घेता २७ लाख ५० हजार बियाणे पाकीटांची मागणी राहील, असा अंदाज होता. आतापर्यंत २५ लाख बियाणे पाकीटांची विक्री झाली आहे. खतांचा तुटवडा भासू नये म्हणून काळजी घेतली जात असून आज एक लाख ४८ हजार मे. टन खते उपलब्ध झाले आहेत. पेरणी झाल्यानंतर खतांची गरज भासणार हे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी गुरूवारी कृषि विभागाला बफर्स स्टॉकमधून ५३०० मे.टन युरिया वाटपाचे तसेच ६०० मे. टन डीएपी खते वितरीत करण्याचे आदेश दिले. कृषीविभागाने एक ब्लॉग केला असून त्यावर प्रत्येक तालुक्यात असलेले किरकोळ खतविक्रेते त्यांचाकडे उपलब्ध असलेला खतांचा स्टॉक एका क्लीकवर शेतक-यांना पाहता येतो. या अद्ययावत माहितीचा शेतक-यांना लाभ होत असल्याचे जिल्हा कृषि अधीक्षक संभाजीराव ठाकूर यांनी बोलतांना सांगितले.

Recent Posts

Prasad Oak : अशा ट्रेंडला वेळीच ठेचलं पाहिजे… मराठी इंडस्ट्रीत हे होऊ देणार नाही!

प्रसाद ओकने नेमका कशावर व्यक्त केला संताप? मुंबई : हल्ली सोशल मीडियावर (Social media) इन्फ्लुएंसर्सची…

4 mins ago

Mumbai Local : जीवनवाहिनी ठरतेय जीवघेणी! केवळ तीन महिन्यांत रेल्वे प्रवासात ५६५ जणांचा बळी

प्रवासी संघटनांनी व्यक्त केला संताप मुंबई : लोकल म्हणजे मुंबईकरांची (Mumbai Local) जीवनवाहिनी समजली जाते.…

48 mins ago

Kiran Sarnaik : आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबियांच्या गाडीला अपघात; ५ जणांचा मृत्यू!

मृतांमध्ये नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश; तर तीन जण जखमी अकोला : गेल्या काही दिवसांत अपघातांच्या…

1 hour ago

Nashik Loksabha : नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का! विजय करंजकरांची बंडखोरी

उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी शब्द फिरवल्याचा केला आरोप नाशिक : लोकसभेच्या दृष्टीने नाशिकची जागा (Nashik Loksabha)…

2 hours ago

PM Modi : “डरो मत, भागो मत”, पंतप्रधान मोदींनी रायबरेलीच्या उमेदवारीवर राहुल गांधींची उडवली खिल्ली!

नवी दिल्ली : काँग्रेसने आज उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारांची घोषणा केली.…

3 hours ago

Voting Awareness : मतदानाला जावंच लागतंय! मेट्रोही देणार मतदानाच्या दिवशी सवलत

मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी महामुंबई मेट्रो प्रशासनाचा निर्णय मुंबई : मतदान (Voting) हा प्रत्येक नागरिकाचा हक्क…

3 hours ago