गौण खनिज उत्पन्नातून कोकण विभागाची विक्रमी वसुली

Share

गत आर्थिक वर्षात १ हजार ११५ कोटींचे उत्पन्न

नवी मुंबई(मच्छिंद्र पाटील) : कोकण विभागात सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात गौण खनिज उत्खनन नियमापासून तब्बल १ हजार ११५ कोटी इतकी विक्रमी रक्कम वसूल करण्यात महसूल विभागास यश आले आहे. गौण खनिज उत्खनन नियमापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचे सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी कोकण विभागाला देण्यात आलेल्या उद्दीष्टाच्या १३५.८८ टक्के वसूली करण्यात आली असल्याची माहिती कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली.

शासन स्तरावरुन कोकण विभागासाठी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरीता गौण खनिज उत्खनन नियमापासून ८२० कोटी रुपये उत्पन्न वसूलीचे उद्दिष्ट निश्चित करुन देण्यात आले होते. सदर उद्दिष्ट १०० टक्के साध्य करण्यासाठी सर्व यंत्रणांनी गौण खनिज उत्खनन नियमांचे काटेकोर पालन करुन त्यासाठी विशेष नियोजन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिल्या होत्या.

त्यानुसार कोकण विभागाने कालबद्ध नियोजन करुन ३१ मार्च, २०२४ अखेरपर्यंत एकूण १ हजार ११५ कोटी उत्पन्नाची वसूली साध्य केली. कोकण विभागाच्या या यशस्वी कामगिरीबद्दल विभागीय महसूल आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सर्व यंत्रणांचे अभिनंदन केले आहे.

जिल्हानिहाय उत्पन्न वसुलीची माहिती पुढीलप्रमाणे : मुंबई शहर ५३ कोटी रुपये , मुंबई उपनगर १८० कोटी, ठाणे २८८ कोटी २४ लाख, पालघर १६३ कोटी ७५ लाख, रायगड २८० कोटी ४२ लाख , रत्नागिरी ८४ कोटी ६६ लाख आणि सिंधुदूर्ग ५४ कोटी ७५ लाख इतकी वसूली करुन कोकण विभागाने गौण खनिज उत्पन्न वसूलीकरिता शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजेच १३५.८८ टक्के उत्पन्न साध्य केले आहे.

Tags: kokan

Recent Posts

लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू हा अपघातच!

जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश! मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणा-या लोकल…

33 mins ago

Bomb Threat : दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार

पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आल्याने खळबळ मुंबई : बसमधून प्रवास करत असताना दोन लोक दादर…

52 mins ago

UPSC : युपीएससी परीक्षार्थींना दररोज ३००० रुपये देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली : स्पर्धा परीक्षांमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तरुणाईमध्ये मोठी चढाओढ सुरु असते. विद्यार्थी रात्रंदिवस…

2 hours ago

नरेंद्र मोदीच हॅटट्रिक करणार! पहिल्या १०० दिवसांचा रोडमॅप तयार

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार असला तरी आपण तिस-यांदा सत्तेत…

2 hours ago

Yogi Adityanath : मोदी तिस-यांदा पंतप्रधान होतील आणि पाकव्याप्त काश्मीर सहा महिन्यांत भारताचा भाग असेल

योगी आदित्यनाथ यांचा ठाम विश्वास पालघर : महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका पार पडणार असून…

5 hours ago

निवडणुकीआधी काश्मिरात दहशतवाद्यांचा उच्छाद! दोन दहशतवादी हल्ले; भाजपाच्या माजी सरपंचाची हत्या

जम्मू : देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) वातावरण आहे. परंतु, काश्मिरात दहशतवाद्यांचा उच्छाद सुरु…

5 hours ago