राऊत थोडक्यात वाचले -छगन भुजबळ

Share

मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक पार पडली. महाराष्ट्रातील राज्यसभेची सहावी जागा चुरशीची होती. या जागेवर भाजपचे धनजंय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार उमेदवार होते. धनंजय महाडिकांनी हा विजय खेचून आणला. राज्यसभा निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही राज्यसभा निकालावर खोचक मत व्यक्त केले. संजय राऊत थोडक्यात वाचले नाहीतर उलटे झाले असते, संजय पवार निवडून आले असते आणि राऊत मागे राहिले असते, असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले.

संजय राऊत यांनी आता अपक्षांची नाव घेऊन त्यांना आणखी दुखवण्यापेक्षा लोकांना जवळ करा, असा सल्लाही छगन भुजबळ यांनी दिला आहे. भुजबळ म्हणाले की, महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून यावेत, यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. पण दुर्दैवाने चौथ्या उमेदवाराचा पराभव झाला. पण महाविकास आघाडीला हा मोठ्ठा धक्का आहे असे नाही, आमच्याकडे १६६ पेक्षा जास्त आमदार होते. आम्ही नियोजनात चुकलो, अशी कबुली भुजबळ यांनी दिली.

भाजपने दोन उमेदवारांना ४८/४८ मते दिली, पहिल्या फेरीनंतर ज्याला जास्त मते आहेत, त्याची मत इतरांना ट्रासन्फर होतात. भाजपची मते ट्रान्स्फर झाली, आमची मते ट्रान्स्फर होण्याचा योगच आला नाही. संजय राऊत यांनाच अडचण निर्माण होते का?अशी परिस्थिती निर्माण झाली होती. महत्वाच्या नेत्यांना आधी सेफ करायला पाहिजे होते. आम्ही १७० पेक्षा १८० मंतांची व्यवस्था करायला पाहिजे होते, यात कमी पडलो, असे भुजबळ म्हणाले.

पवार साहेबांचे मार्मिक स्टेटमेंट आले आहे, देवेंद्र फडणवीस अधिक लोकांना जवळ करण्यात यशस्वी ठरले. याचा दुसरा अर्थ आम्ही तिन्ही पक्षाच्या लोकांनी समजून घेतला पाहिजे. अधिक लोक जवळ केली पाहिजेत. तिन्ही पक्षाच्या आमदारांची नाराजी मोठ्या प्रमाणात उफाळून आली होती. नाराजी निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. महाविकास आघाडीचा आमदार आपल्याच पक्षाचा असतो, असे समजून काम करायला पाहिजे. आमदार दुखावला जाणार नाही, त्यांच्या कामात अडथळा निर्माण होणार नाही, याची शिकवण आम्हाला मिळाली आहे, अशी कबुलीही भुजबळ यांनी दिली.

Recent Posts

देशात तिसऱ्या टप्प्यात ६१ टक्के तर महाराष्ट्रात ५४.०९ टक्के मतदान

मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी पार पडले. यामध्ये १२ राज्ये आणि…

16 mins ago

कडिपत्ता खाण्याने दूर होतात हे आजार

मुंबई: कडिपत्त्याचे सेवन खाण्यापासून ते अनेक औषधांमध्ये केला जातो. यातील अनेक औषधीय गुण अनेक आजारांमध्ये…

28 mins ago

तुम्ही रात्री ११ नंतर झोपत नाही ना? आजच बदला ही सवय

मुंबई: आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये प्रत्येकाला लवकर यशस्वी व्हायचे असते आणि या शर्यतीत अनेकदा आपण आपली…

3 hours ago

Cyber Crime : मित्रासोबतचे वाद मिटवण्याच्या नादात ज्योतिषाने लावला चुना!

जाणून घ्या नक्की प्रकरण काय? मुंबई : देशभरात मोठ्या प्रमाणात सायबर जाळे पसरत आहे. कधी…

4 hours ago

Rupali Chakankar : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल

काय आहे प्रकरण? मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) आज देशभरात तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार…

4 hours ago