नाशिक: राज ठाकरेंच्या भाषणांना होणाऱ्या गर्दीचं मतांमध्ये रुपांतर होत नाही. आज नाशिक दौऱ्यादरम्यान त्यांनी ही खंत सवाल विचारत व्यक्त केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. ते तेथील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकांसह विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. त्यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी ही खंत व्यक्त केली.
दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांनी आज सकाळी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी सुरत-चेन्नई महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी आपलं गाऱ्हाण राज ठाकरेंसमोर मांडलं. जमीन अधिग्रहित करताना आपल्याला विचारलं नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांनी केली. यावेळी शेतकऱ्यांनी राज्यात अवकाळी पावसामुळं शेतीचं झालेलं नुकसान, बॅंकेची वसुली, कांद्याचं भाव पाडणं याविषयावरही आपलं गाऱ्हाणं मांडत राज ठाकरे यांनी यावर तोडगा काढवा, अशी मागणी केली.
यावेळी राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना, तुम्ही अडचणीच्या काळात माझ्याकडे येता, मग मतदानाच्या वेळी काय होतं? असा सवाल केला. राज ठाकरे पुढे म्हणाले, दरम्यानच्या काळात शेतकरी संपावर गेले होते. तेव्हा काही शेतकरी बांधव मला भेटायला आले. मी त्यांना सांगितले की, अडचणीच्या वेळी माझ्याकडे येता आणि निवडणुकीत मतदान त्यांना करता. त्यावेळी शेतकरी मला म्हणाले, साहेब, समस्या वेगळी आणि मतदान वेगळे.
राज ठाकरे पुढे म्हणाले, जे तुम्हाला मदत करत नाहीत त्यांना तुम्ही मतं देत असाल तर मग अडचणीच्या वेळी माझ्याकडे का येता? महाराष्ट्र टोलमुक्त करू असे म्हणणाऱ्यांना तुम्ही मतदान केलं की नाही? जे तुमची पिळवणूक करतात, त्यांनाच तुम्ही मतदान करता. आपण काय करत आहात याची जाणीव ठेवा, असा रोखठोक शब्दांत सल्लाही राज ठाकरे यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला.
ऐन निवडणुकीच्या काळात राऊतांना 'ते' वक्तव्य चांगलंच भोवणार मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत…
बुलढाणा बस दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता वाचली! बुलढाणा : गतवर्षी जून महिन्यात बुलढाणा येथे एक…
कालच्या राड्याप्रकरणी मिहिर कोटेचा यांचा मुंबईकरांना सवाल मविआच्या २५-३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; ५ जण पोलिसांच्या…
हसन मुश्रीफांनी घटनेची दखल घेत तातडीने आर्थिक मदत करण्याच्या दिल्या सूचना कोल्हापूर : कोल्हापुरातून (Kolhapur)…
कारण सांगताच घरचेही अवाक नवी दिल्ली : 'तारक मेहता का अलटा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतून…
मुंबई: लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४मधील(ipl 2024) ६७व्या सामन्यात हरवले. लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी…