मुंबई (प्रतिनिधी) :भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्याअटकपूर्व जामिन याचिकेवर गुरुवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. या प्रकरणी आता सोमवारी १७ जानेवारी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत न्यायालयाने नितेश राणे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यास मनाई केली आहे. याआधी नितेश राणे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.राज्य सरकारने नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर सुनावणी होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर कठोर कारवाई करणार नसल्याची हमी उच्च न्यायालयात दिली होती.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आणि आमदार नितेश राणे अखेर १८ दिवसांनी माध्यमांसमोर आले आहेत. कोर्टाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील नूतन अध्यक्षांची भेट घेत अभिनंदन केले. यावेळी त्यांना भेटण्यासाठी समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
डॉ. भारती पवार, हेमंत गोडसे करणार अर्ज दाखल नाशिक : तब्बल दीड महिन्यानंतर महायुतीकडून नाशिक…
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची १९६० साली निर्मिती झाली. मुंबई टिकविण्यासाठी मराठी माणसांनी रक्त सांडले. वर्षामागून वर्षे…
आशय अभ्यंकर, प्रख्यात अभ्यासक देश जागतिक पातळीवर विकासाच्या नवनवीन पायऱ्या पार करत असताना कामगारांची उत्तम…
हेमंत देसाई, ज्येष्ठ पत्रकार भारतातून मॉरिशसला निधी पाठवायचा, तेथे कंपनी स्थापन करायची आणि मग तो पैसा…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४६. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग शुक्ल. चंद्रराशी मकर,…
CSK vs PBKS: चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्जस हे दोन्ही संघ गुणतालिकेत पुढे जाण्यासाठी…