प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल योजनांना चालना द्यावी

Share

अहमदनगर- केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देशभर नागरिकांचे स्वतःच्या हक्काचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी विविध योजना केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबविली जात आहे.परंतु स्थानिक पातळीवर अहमदनगर महानगरपालिकेच्या मार्फत सुरू असलेल्या घरकुल योजनेच्या कामात विविध अडचणी निर्माण होत आहे.या अडचणी सोडविण्यासाठी १८ जानेवारी रोजी पदाधिकारी अधिकारी व ठेकेदारां ची संयुक्त बैठकीच्या योजना अहमदनगर महापालिकेत करण्यात आली असल्याची माहिती महापौर रोहिणी शेंडगे व उपमहापौर गणेश भोसले यांनी दिली.

शहरी गृहनिर्माण व व्यवहार मंत्रालय,मुंबई यांच्या आदेशान्वये आखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था,मुंबई यांच्या मार्फत प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होणेकरीता सर्व नगरसेवकांसाठी ऑन लाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ४ घटक असुन यामध्ये प्रामुख्याने एएचपी,बीएलसी,आयएसएसआर,रमाई योजनेचे काम महानगरपालिकेमार्फत सुरु आहे.या योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचविण्या साठी व त्यांना या योजनेची सविस्तर माहिती मिळावी याकरीता हे प्रशिक्षण आयोजित केले होते.या प्रशिक्षणात पंतप्रधान आवास योजने अंतर्गत होणारी कामे व त्याचा फायदा व मिळणारी सवलत याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली.पंत प्रधान आवास योजना सन २०१५ मध्ये सुरु झाली असुन अहमदनगर महानगरपालिकेमार्फत केडगांव व नालेगाव येथे योजना राबविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणामध्ये महापौर रोहिणी शेंडगे म्हणाल्या की,या पुर्वी महानगरपालिके मार्फत राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेबाबत आलेल्या अनुभवातुन यापुढील योजना नागरिकांना सर्वसुविधा मिळतील अशा प्रकारे चांगल्या पध्दतीने राबवाव्यात.यावेळेस उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की,घरकुल योजना प्रभावीपणे राबविण्याकरीता व या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याकरता १८ जानेवारी रोजी महानगरपालिकेचे पदाधिकारी,अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्या समवेत मिटिंगचे आयोजन करण्यात यावे.

Recent Posts

DC vs RR: सॅमसंगचा वादग्रस्त झेल, दिल्लीसमोर राजस्थान फेल…

DC vs RR: दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगलेला सामना दिल्लीसाठी खूपच महत्त्वाचा आहे.…

3 hours ago

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात शांततेत मतदान

महायुतीच्या कार्यकर्त्यांत कमालीचा उत्साह सिंधुदुर्ग : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात…

5 hours ago

देशात तिसऱ्या टप्प्यात ६१ टक्के तर महाराष्ट्रात ५४.०९ टक्के मतदान

मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी पार पडले. यामध्ये १२ राज्ये आणि…

5 hours ago

कडिपत्ता खाण्याने दूर होतात हे आजार

मुंबई: कडिपत्त्याचे सेवन खाण्यापासून ते अनेक औषधांमध्ये केला जातो. यातील अनेक औषधीय गुण अनेक आजारांमध्ये…

5 hours ago

काँग्रेसकडून कसाबचे समर्थंन हे देशासाठी धोकादायक

पंतप्रधान नरेंद्र मोदींने ओढले काँग्रेसच्या पाकिस्तानधार्जिण्या भूमिकेवर आसूड नगर : मुंबईवर झालेल्या २६/११ सागरी हल्ला…

6 hours ago

मतांच्या लाचारीमुळे उद्धव ठाकरे बसले गप्प; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

मुंबई : पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या वडेट्टीवार यांच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? असा सवाल आता…

7 hours ago