पुणे (हिं.स.) : खडकवासला धरणाच्या पाण्यावर वीजनिर्मिती करण्याच्या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. चार ते पाच महिन्यांत वीजनिर्मिती सुरू होईल. खडकवासला धरणातून मुठा उजवा कालव्यात शेतीसाठी सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर १.२ मेगावॉट वीजनिर्मिती करणार आहे. यामुळे आठशे ते हजार घरांना पुरेल, एवढी वीजनिर्मिती यातून होणार आहे.
पानशेत धरण फुटीच्या दुर्घटनेत पुणेकरांचे अतोनात नुकसान झाले, त्यानंतर धरणांच्या सुरक्षिततेसाठी अनेक योजना राबविला. त्यापुढे एक पाऊल टाकत आता खडकवासला धरणातून वीजनिर्मितीचे काम हाती घेतले आहे. खडकवासला धरणातून मुठा उजवा कालव्यात सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प २००६ मध्ये मंजूर झाला.
त्यानुसार या प्रकल्पात ६०० किलोवॉटच्या दोन जनित्रांद्वारे १.२ मेगावॉट वीजनिर्मिती करणार आहे. हे वीजनिर्मितीचे काम बीओटी तत्त्वावर एका कंपनीला दिले आहे.
जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश! मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणा-या लोकल…
पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आल्याने खळबळ मुंबई : बसमधून प्रवास करत असताना दोन लोक दादर…
नवी दिल्ली : स्पर्धा परीक्षांमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तरुणाईमध्ये मोठी चढाओढ सुरु असते. विद्यार्थी रात्रंदिवस…
मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार असला तरी आपण तिस-यांदा सत्तेत…
योगी आदित्यनाथ यांचा ठाम विश्वास पालघर : महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका पार पडणार असून…
जम्मू : देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) वातावरण आहे. परंतु, काश्मिरात दहशतवाद्यांचा उच्छाद सुरु…