Polygamy:एकापेक्षा जास्त विवाह करणे पडणार भारी, या राज्यात लागणार बंदी

Share

दिसपूर: आसामच्या (assam) हिमंता बिस्वा सरमा सरकारने राज्यात बहुविवाह (polygamy) संपवण्याच्या उद्देशाने आपले पाऊल टाकले आहे. यासाठी सरकारने प्रस्ताविद कायद्याबाबत जनतेकडून प्रतिक्रिया मागवल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमाने ट्विटरवर याबाबत माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक सरकारी सार्वजनिक नोटीस जाहीर करताना लोकांकडून आसाममधील एकापेक्षा अधिक विवाहावर बंदी घालण्याबाबतच्या प्रस्तावित कायद्यावर सल्ले देण्याचे अपील केले आहे.

३० ऑगस्टपर्यंत पाठवू शकता सूचना

गृह तसेच राजकीय विभागाचे प्रधान सचिव यांनी जारी केलेल्या नोटीसमध्ये लोकांना ३० ऑगस्टपर्यंत इमेल अथवा पोस्टाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यात असाही उल्लेख करण्यात आला आहे की आसाम सरकारने बहुविवाहावर बंदी घालण्यासाठी एका तज्ञ समितीची स्थापना केली होती. या समितीने आपला रिपोर्ट सरकारला सादर केला आहे. यावर आता सरकार पुढील कारवाई करणार आहे.

आसाम सरकारचे पुढचे पाऊल

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की राज्य विधानसभा बहुविवाहाच्या प्रथेवर बंदी घालण्यासाठी कायदा बनवण्यास सक्षम आहे. विवाह समवर्ती सूचीच्या अंतर्गत येते ज्यावर केंद्र आणि राज्य दोघेही कायदा बनवू शकतात.

एकापेक्षा अधिक पत्नी इस्लामचा भाग नाहीत

नोटीसमध्ये तज्ञ समितीच्या रिपोर्टचा हवाला देताना म्हटले की, इस्लामच्या संबंधामध्ये कोर्टाचे म्हणणे आहे की एकापेक्षा अधिक पत्नी असणे हा धर्माचा अविभाज्य भाग नाही. पत्नीची संख्या मर्यादित राखणारा कायदा धर्माचे अनुपालन करण्याच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे एकच विवाहाला समर्थन देणारे कायद्याच्या अनुच्छेद २५चे उल्लंघन करत नाहीत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

6 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

7 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

8 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

8 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

8 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

9 hours ago