नवी दिल्ली : दिल्लीमध्ये प्रदूषणाची (Pollution) समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी दिल्लीचा एक्यूआय (AQI) ५०० वर पोहोचला आहे. हवेची ही पातळी “गंभीर” श्रेणीत मोडते. एक दिवस आधी शुक्रवारी ते ४०० होते.
यंदाचा नोव्हेंबर महिना २०१५ नंतर नऊ वर्षांतील सर्वात प्रदूषित (Pollution) महिना ठरला आहे. या महिन्याच्या २४ दिवसांपैकी असा एकही दिवस गेलेला नाही जेव्हा दिल्लीचा एक्यूआय २०० च्या खाली गेला असेल. या महिन्यात दिल्लीतील लोकांना सतत ‘खराब’, ‘खूप वाईट’, ‘गंभीर किंवा ‘अत्यंत गंभीर’ श्रेणीतील हवा श्वास घ्यावी लागत आहे.
दिल्लीतील वीस क्षेत्रे आहेत जिथे एक्यूआय “अत्यंत गंभीर” श्रेणीत पोहोचला आहे. येथील एक्यूआय ४०० च्या पुढे गेला आहे. त्याच वेळी, काही भागात एक्यूआय ४७० च्या पुढे गेला आहे. हे सर्व क्षेत्र आधीच प्रदूषणाचे हॉट स्पॉट म्हणून ओळखले जातात.
सध्या दिल्लीत वाऱ्याचा वेग खूपच कमी झाला आहे. विशेषत: सकाळच्या वेळी वारा अतिशय शांतपणे वाहत असतो. दिवसा वारा वाहत असतानाही त्याचा वेग ताशी चार किलोमीटर इतकाच राहतो. त्यामुळे प्रदूषक कणांचा प्रसार अत्यंत संथ होत चालला आहे. आकाशातही धुक्याचा थर पसरला आहे. लोकांना सामान्यपेक्षा जास्त प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे.
सोमवारी २० मे रोजी मुंबई शहरातील सहा लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. सहा लोकसभा मतदारसंघांसाठी…
विवेक वेलणकर: सामाजिक कार्यकर्ते प्रसिद्धीचे एक माध्यम म्हणून अवाढव्य होर्डिंग उभे करण्याचा पायंडा पडला आणि…
रवींद्र तांबे दिनांक १३ मे, २०२४ रोजी सायंकाळी ४.३०च्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर पूर्वेकडील द्रुतगती…
MI vs LSG: मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला.…
वंचितच्या प्रकाश आंबेडकरांची टीका मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पुन्हा…
पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंवर घणाघात मुंबई : मुंबई चैत्यभूमीतून प्रेरणा घेते, हे आमचे सरकार आहे.…