मुंबई : पोलीस ठाण्यात गटारी साजरी करु नका, अन्यथा कारवाई केली जाईल, अशी ताकीद मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे. पोलीस ठाणे ही सार्वजनिक जागा असल्याने या ठिकाणी प्राण्यांची कत्तल न करण्याच्या सूचना मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत. ही प्रथा बंद करावी अशा सूचना पोलीस दलाच्या वतीने जारी केलेल्या पत्रकात देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे जुलै २०१२ मध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांनी असेच आदेश काढले होते. त्यानंतरही दरवर्षी असे आदेश दिले जातात. मात्र, काही पोलीस ठाण्यांमध्ये गटारी साजरी करण्यात येते.
यावर्षी मुंबई पोलिसांनी काढलेल्या परिपत्रकात पोलीस ठाण्याच्या आवारात गटारी साजरी करु नये, असे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले असून याचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच सर्व पोलीस उपायुक्तांना आपापल्या हद्दीतील पोलीस ठाण्यात तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांची कत्तल करुन गटारी साजरी होणार नाही याकडे लक्ष ठेवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
पुढील आठवड्यातील शुक्रवार म्हणजेच २९ जुलै पासून श्रावण महिना सुरु होत आहे. तत्पूर्वी गुरुवारी २८ जुलै रोजी आषाढी अमावास्या आहे. आषाढी अमावास्येला राज्यात ‘दिप अमावास्या’ म्हणून दिप पूजन केले जाते. मात्र काही विकृत लोकांकडून या दिवसाला ‘गटारी’ म्हणून संबोधण्यात येते. त्याचे अनुकरण करत मुंबईतील पोलीस ठाणे/ शाखा/ कार्यालये इत्यादी ठिकाणी श्रावण महिना सुरु होण्याअगोदर साधारणतः २ ते ३ दिवस ‘गटारी’ साजरी करण्यात येते.
याआधी ‘गटारी’च्या दिवशी पोलीस ठाण्यातच कोबडी किंवा बोकडाचा बळी दिला जायचा. नंतर ते जेवणात प्रसाद म्हणून वाटले जायचे. पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हत्या झालेली व्यक्ती, आत्महत्या किंवा अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या आत्म्यास शांती मिळावी आणि पोलीस ठाण्याचे कामकाज सुरळीत चालावे, अशी त्या मागची धारणा होती. मात्र, अशा अंधश्रद्धेला खतपाणी न घालता ही प्रथाच बंद करावी, असे या परिपत्रकात म्हटले आहे.
या प्रथेला प्राणी संरक्षण संघटनांकडूनही विरोध आहे. पोलीस दल हे समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करत असल्याने पोलिसांनी स्वतः कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. पोलीस ठाणे हे ‘सार्वजनिक जागा’ या संज्ञेखाली येतात. त्यामुळे अशा ठिकाणी प्राणीमात्रांची कत्तल करणे हे बेकायदेशीर असून अशी कृत्ये करणारी व्यक्ती कायदेशीर कारवाईला पात्र ठरते, असे या पत्रकात म्हटले आहे.
पोलीस ठाण्याच्या आवारात बोकड किंवा कोंबडीची कत्तल केल्यास मुंबई महानगरपालिका कायदा १९९८, प्रिव्हेन्शन ऑफ क्रुॲल्टी टू ॲनिमल ॲक्ट १९६०, मुंबई पोलिस कायदा १९५१ अंतर्गत कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराच देण्यात आला आहे.
मुंबईत जे घडतं, त्याची चर्चा देशभर होते. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यांतून लोक…
फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे काही लोकांना सतत खोटं बोलण्याची सवय असते. छोट्या-छोट्या गोष्टींवरून अनेकदा सातत्याने…
इंडिया कॉलिंग: डॉ. सुकृत खांडेकर लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झालेत. मुंबईसह महाराष्ट्रात सर्व…
मुंबई: कोलकाता नाईट रायडर्सची अय्यर जोडीने कमाल केली. कोलकाता नाईट रायडर्सने हैदराबादला हरवत दिमाखात आयपीएलच्या…
मुंबई: झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यातून हैराणजनक बातमी समोर आली आहे. येथे रील बनवण्याच्या नादात तरुणाने १००…
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील अनेक मतदान केंद्रावर मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे नसल्याचे…