नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत संघातील सहभागाबाबत भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने मोठे वक्तव्य केले. एकही कसोटी न खेळता मी थेट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणे हे माझ्या सहकारी खेळाडूंची फसवणूक होईल, असे पंड्या म्हणाला.
पंड्या म्हणाला की, संघातील खेळाडू वर्षभर कसोटी खेळत आहेत आणि संघात स्थान मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत. अशा परिस्थितीत मी एकही कसोटी न खेळता थेट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणे हे माझ्या सहकारी खेळाडूंची फसवणूक केल्यासारखे होईल.
पंड्या पुढे म्हणाला की, मी डब्ल्यूटीसी फायनल आणि आगामी कसोटी मालिकेसाठी उपलब्ध असणार नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेपूर्वी पत्रकार परिषदेत पंड्याने ही माहिती दिली.
पंड्या पुढे म्हणाला की, श्रेयस अय्यरच्या पाठीची दुखापत संघासाठी चिंताजनक आहे. विश्वचषक स्पर्धा जवळ आलेली असताना श्रेयसच्या पाठीच्या दुखापतीमुळे संघाचे चौथे स्थान रिक्त झाले आहे. अय्यर तंदुरुस्त नसल्यास आम्हाला लवकरात लवकर त्याची जागा शोधावी लागेल. श्रेयस अय्यर हा मोठा फलंदाज आहे आणि त्याने लवकरात लवकर संघात परतावे अशी आमची इच्छा आहे.
नक्षत्रांचे देणे : डॉ. विजया वाड प्रेमकहाणी या लेखामधून दोन प्रेमी जीवांची झालेली ताटातूट, तरी…
विशेष : लता गुठे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली झाडे आणि त्यांच्या एकमेकांमध्ये गेलेल्या फांद्या यामुळे…
विशेष : भालचंद्र ठोंबरे महाभारतात कौरव पांडवांचे युद्ध होणार, हे निश्चित झाल्यावर, देशोदेशीच्या राजांनाही या…
नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे बाबुभाई मिस्त्री यांनी दिग्दर्शित केलेला ‘पारसमणी’(१९६३) ही एक छोटी संगीत मेजवानी…
आनंदी पालकत्व : डॉ. स्वाती गानू पूर्वी मनोरंजन हाच कार्टून्सचा मुख्य हेतू होता. तंत्रज्ञानातील बदलाने…