मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट प्रशासनाने डिजिटल सिस्टमवर अधिक भर दिला असून बेस्टने डिजिटल तिकीट सेवा सुरू केली आहे. गेल्या पाच महिन्यांत ६० टक्के प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.
बेस्टला आर्थिक तोट्यातून बाहेर काढणे तसेच प्रवाशांना अत्याधुनिक सेवा पुरवणे यासाठी बेस्टने ऑटोमॅटिक सिस्टमवर अधिक भर दिला आहे. याचाच एक भाग म्हणून बेस्टने डिजिटल सेवा सुरू केली. बेस्टचे ‘चलो’ सारखी स्मार्ट कार्ड सेवा प्रवाशांच्या पसंतीला उतरत आहे. बेस्टचे १२ टक्के प्रवासी ‘चलो’ अॅपचा वापर करतात.
बेस्टने स्मार्ट कार्डच्या माध्यमातून ऑनलाईन सेवा देण्यावरही भर दिला आहे. यात डिजिटल तिकीटिंगमुळे प्रवाशांना घरबसल्या सेवा मिळत असून प्रवाशांना ऑनलाइन रिचार्जची सुविधाही उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे यामुळे प्रवासी आणि वाहकांमध्ये होणारा सुट्ट्या पैशांचा वादही संपला. डिजिटल सेवेचा लाभ घेण्याचे प्रमाण वाढत असून गेल्या पाच महिन्यांत ६० टक्के म्हणजे १८ लाखांपेक्षा अधिक प्रवाशांनी या सोयीचा वापर केला आहे.
नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने (IMD) आज देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा…
आधी त्यांनी ईव्हीएम मशीनच्या नावाने बोंबा ठोकल्या मग मतांच्या टक्केवारीवर प्रश्नचिन्ह उभे केले आता बोटाच्या…
ऐन निवडणुकीच्या काळात राऊतांना 'ते' वक्तव्य चांगलंच भोवणार मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत…
बुलढाणा बस दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता वाचली! बुलढाणा : गतवर्षी जून महिन्यात बुलढाणा येथे एक…
कालच्या राड्याप्रकरणी मिहिर कोटेचा यांचा मुंबईकरांना सवाल मविआच्या २५-३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; ५ जण पोलिसांच्या…
हसन मुश्रीफांनी घटनेची दखल घेत तातडीने आर्थिक मदत करण्याच्या दिल्या सूचना कोल्हापूर : कोल्हापुरातून (Kolhapur)…