नवी दिल्ली: परीक्षा पे चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांना अनेक मोलाचे सल्ले दिले. त्यांनी मुलांशी बातचीत केली. यावेळेस पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना रील्स बघण्यात वेळ घालवू नका असाल सल्ला दिला. ते म्हणाले, मुलांनो रील्स पाहण्यात आपला वेळ वाया घालवू नका. आपल्या अभ्यासावर लक्ष द्या. त्यांनी या वयात भोजन आणि झोपेचे संतुलन बनवणे गरजेचे असते. मुलांनी भरपूर झोप घेतली पाहिजे. केवळ मोबाईल नाही बघितला पाहिजे.
मोदी पुढे म्हणाले, अनेक लोक तासनतास मोबाईल बघत असतात. मुलांना सांगितले की मोबाईल पाहण्याची एक वेळ ठरवा. प्रत्येक वेळेस मोबाईल पाहणे गरजेचे नसते. याशिवाय आपला स्क्रीन टाईम ठरवा. नाहीतर घरच्यांना वाटेल की हा मित्रांसोबत आहे अथवा रील्स पाहत आहे.
मोबाईलला जशी रिचार्ज करण्याची गरज पडते. तसेच शरीरालाही रिचार्ज करावे लागते. ही शरीराची गरज आहे. ते मुलांना म्हणाले की, केवळ अभ्यास एके अभ्यासच करायचा नाही. खेळत तर खेळतच राहायचे नाही. असे नाही केले पाहिजे. जीवनात संतुलन बनवणे महत्त्वाचे असते. यासाठी स्वस्थ शरीर, स्वस्थ मन गरजेचे. कधी कधी सूर्यप्रकाशात बसून अभ्यास करा.
पंतप्रधान मोदींनी शिक्षकांनाही अपील केले.ते म्हणाले, शिक्षकांनी हे समजले पाहिजे की त्यांचे नाते केवळ अभ्यासक्रम अथवा विषयापर्यंतच असू नये. त्यांनी मुलांसोबत असे नाते बनवले पाहिजे यामुळे मुलांचा विश्वास कमावता येईल.
मतदारयादीत नाव नसल्याने मतदारांचा हिरमोड मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदार संघात…
मुंबई: अंबाती रायडू(ambati raydu) इंडियन प्रीमियर लीगमध्ये(indian premier league) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ससाठी…
मुंबई: प्रत्येक आई-वडिलांना वाटत असले की विकास योग्य पद्धतीने व्हावा. मात्र हे समजून घेणे गरजेचे…
कुटुंबीय सुरक्षित मात्र मालमत्तेचे नुकसान मुंबई : ‘बिग बॉस’ रिअॅलिटी शोमधून (Bigg Boss reality show)…
नवी दिल्ली : देशात होणारी ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) रोखण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) तब्बल…
अभिनेते परेश रावल यांनी व्यक्त केलं परखड मत मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha 2024…