कोलंबो: भारत(india) आणि पाकिस्तान(pakistan) यांच्यातील आशिया चषक २०२३मधील (asia cup 2023) सुपर ४ सामन्यात भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी ३५७ धावांचे आव्हान ठेवले आहे.
विराट कोहली आणि के एल राहुल यांच्या शानदार शतकांच्या जोरावर भारताने ३५६ धावांची खेळी केली. राहुलने आपले सहावे आणि कोहलीने ४७वे वनडे शतक ठोकले. राहुलने १०६ चेंडूत १११ आणि कोहलीने ९४ बॉलमध्ये १२२ धावांची नाबाद खेळी केली. दोघांनी १९४ चेंडूत २३३ धावांची भागीदारी केली.
याआधी रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात केवळ २४.१ षटकांचा खेळ झाला होता. पावसाने सामन्यात खोडा घातल्याने पुढील सामना होऊ शकला नव्हता. पाकिस्तानने टॉस जिंकत भारताला फलंदाजीचे निमंत्रण दिले. भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलने दमदार सुरूवात करून दिली होती. रोहितने ४९ चेंडूत जबरदस्त ५६ धावांची खेळी केली होती. या दरम्यान ४ षटकार आणि ६ चौकार ठोकले. तर शुभमन गिलने ५२ चेंडूत ५८ धावांची खेळी केली होती.
त्यानंतर २ बाद १४७ धावांवरून आज खेळ सुरू झाला. विराट कोहली आणि लोकेश राहुलने या सामन्यात दमदार कामगिरी केली. या दोघांनी शतके ठोकत भारताला साडेतीनशे पार धावसंख्या उभारून दिली.
मुंबई: राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना रद्द होण्यासोबतच आयपीएलच्या लीग सामन्यांची सांगता…
मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४च्या पाचव्या टप्प्यात आठ राज्यातील ४९ जागांवर आज मतदान होत आहे. सकाळी…
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…
संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…
दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…
चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…