Share

वेस्ट इंडिजकडून ३ विकेटनी पराभव

शारजा (वृत्तसंस्था) : गतविजेता वेस्ट इंडिजकडून चुरशीच्या लढतीत शुक्रवारी ३ धावांनी पराभूत व्हावे लागल्याने बांगलादेशचे आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमधील आव्हान सुपर-१२ फेरीतच संपुष्टात आले. ग्रुप १ गटात असलेल्या बांगलादेशचा हा सलग तिसरा पराभव आहे.

वेस्ट इंडिजचे १४३ धावांचे लक्ष्य गाठताना बांगलादेशने २० षटकांत ५ बाद १३९ धावांची मजल मारली. तिसऱ्या क्रमांकावरील लिटन दास (४३ चेंडूंत ४४ धावा) तसेच मधल्या फळीतील कर्णधार महमुदुल्लाच्या (२४ चेंडूंत नाबाद ३१ धावा) फटकेबाजीमुळे सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. शेवटच्या षटकात १३ धावांची गरज असताना आंद्रे रसेलने नऊ धावा देत प्रतिस्पर्ध्यांना विजयापासून रोखले. तसेच गतविजेत्यांचे स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले. वेस्ट इंडिजच्या प्रत्येक गोलंदाजाने विकेट घेत विजयात मोलाचा वाटा उचलला.

त्यापूर्वी, वनडाऊन रोस्टन चेस आणि निकोलस पूरनच्या आक्रमक खेळीमुळे विंडीजने २० षटकांत ७ बाद १४२ धावा केल्या. ख्रिस गेलसह (४) इविन लुइस (६), शिमरॉन हेटमायर (९) लवकर बाद झाल्याने संघाची अवस्था ३ बाद ३२ धावा अशी झाली. मात्र, चेसने पूरनसह वेस्ट इंडिजला दीडशेच्या घरात केले. चेसने ४६ चेंडूंत ३९ धावा केल्या. त्यात २ चौकारांचा समावेश आहे. पूरनने २२ चेंडूंत एक चौकार आणि ४ षटकारांसह सर्वाधिक ४० धावा केल्या.

पोलार्ड रिटायर्ड आऊट की रिटायर्ड हर्ट?

कर्णधार पोलार्ड अचानक मैदान सोडून पॅव्हेलियनमध्ये परतला. पॅव्हेलियनमध्ये परतण्यापूर्वी पोलार्डने १६ चेंडूत केवळ ८ धावा केल्या होत्या. पोलार्डला फटकेबाजी करता येत नसल्याने त्याने पॅव्हेलियनमध्ये परतण्याचा निर्णय घेतला.

Recent Posts

Garlic: लसूण खाल्ल्याने वाढेल तुमचे आयुष्य, मात्र अशा पद्धतीने करा सेवन

मुंबई: आपल्या चांगल्या आरोग्यासाठी माणसाला ८ ते ८ तासांची झोप गरजेची असते. झोप पूर्ण न…

2 hours ago

मुंबईला २० ते २२ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

दोन धरणात शून्य टक्के पाणीसाठा सातपैकी पाच धरणांनी गाठला तळ मुंबई : मुंबईला २० ते…

2 hours ago

मुंबई आशियातील २१ वे सर्वात महागडे शहर

मुंबई : मुंबई आशियातील २१ वे सर्वात महागडे शहर ठरले आहे, तर नवी दिल्ली आता…

2 hours ago

Gautam Gambhir : गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट, समोर आला हा फोटो

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४मध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्या सहकारी पक्षांसोबत मिळून सलग तिसऱ्यांदा सरकार बनवले.…

3 hours ago

रत्नागिरीमध्ये १९ जूनपासून पोलीस भरतीला सुरुवात

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९ जून ते १ जुलै या कालावधीत पोलीस भरती प्रक्रिया राबविली…

3 hours ago

उद्धव ठाकरेंनी कोकणाच्या जनतेची माफी मागावी; आमदार नितेश राणे यांनी दिला इशारा

कणकवली : कोकणी माणूस स्वाभिमानी आहे. तो वेळेत कर्जफेड करतो, कुठलाही जिल्हा बँककडे जावा शून्य…

3 hours ago