आता हनुमानाच्या जन्मस्थळावरून वादंग

Share

त्रंबकेश्वर : हनुमानाचे जन्म ठिकाण निश्चित कोणते? यावरून आता वादंग सुरू झाला असून कर्नाटकातील किश्किंद येथील मठाधिपतींनी नाशिकमध्ये येऊन अंजनेरी येथील साधू-महंत यांना आव्हान दिले आहे. त्यासाठी आता येत्या मंगळवारी नाशिकमध्ये धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे नाशिक त्र्यंबकेश्वर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कर्नाटकातील किश्किंद येथील हनुमान मठाचे मठाधिपती गोविंदानंद सरस्वती महाराज हे शनिवारी नाशिकमध्ये दाखल झाले असून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळील अंजनेरी हे हनुमानाचे जन्म ठिकाण नाही, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे नाशिक व त्रंबकेश्वरमधील साधू-महंतांना जर अंजनेरी हे हनुमानाचे जन्म ठिकाण वाटत असेल तर त्याबाबतची इतिहास कालीन कागदपत्रे किंवा पुरावा हा ३१ तारखेला म्हणजे मंगळवारी होणाऱ्या धर्मसभेमध्ये सादर करावा असे खुले आव्हान दिले आहे.

याबाबत धर्मसभा नाशिक रोड या परिसरात घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, दुसरीकडे हनुमान पिठाचे गोविंदानंद सरस्वती यांनी जे खुले आव्हान दिले आहे. त्यामुळे नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील साधू-महंत हे संतप्त झाले आहेत. यातून काही मार्ग निघावा म्हणून अनिकेत शास्त्री जोशी हे प्रयत्न करीत आहेत. परंतु शनिवारी संध्याकाळपर्यंत तरी यात कोणताही मार्ग निघालेला नव्हता. यावरून मात्र नाशिकमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून कर्नाटकातील हनुमान पीठाचे मठाधिपती गोविंदानंद सरस्वती महाराज यांनी नाशिकमध्ये तळ ठोकला आहे. त्यामुळे येणाऱ्या दोन-तीन दिवसांमध्ये यावर काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Recent Posts

LS Election : शिवतिर्थावर आज ‘मोदी-राज’ अवतरणार!

मुंबई : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार (LS Election) करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी,…

3 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दि १७ मे २०२४.

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध नवमी ८.४८ पर्यंत नंतर दशमी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा…

3 hours ago

मोदींच्या रोड शोमुळे मतदारांचा उत्साह शिगेला

देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेकाॅर्डब्रेक गर्दीच्या सभा होताना दिसतात; परंतु पंतप्रधान मोदी यांना जवळून…

6 hours ago

अवयवदान प्रबोधनाची चळवळ

कुमार कदम शरीरातील केवळ कोणता तरी महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यूशी निकराची झुंज देत असलेली…

7 hours ago

आरोग्य विम्यासाठी वयाची अट काढली, पण…

अभय दातार, मुंबई ग्राहक पंचायत मागच्या महिन्यात एक महत्त्वाची बातमी सगळीकडे प्रसिद्ध झाली, ती म्हणजे…

7 hours ago

पहिल्या चार टप्प्यातच झालाय महाविकास आघाडीचा सुपडा साफ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला दावा मुंबई : महाराष्ट्रात चार चरणांच्या निवडणूक पूर्ण झाल्या आहेत. २०…

11 hours ago