नवी दिल्ली (प्रतिनिधी) : शाकाहारी मुलांचे वजन मांसाहारी मुलांपेक्षा निम्म्याहून कमी असू शकते. दोन ते पाच वर्षं वयोगटातल्या मुलांवर केलेल्या अभ्यासात अन्नामुळे असे होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. टोरंटो इथल्या सेंट मिशेल्स हॉस्पिटलच्या नेतृत्वात केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे.
संशोधनात शाकाहारी मुलांची उंची, बीएमआय आणि पोषण हे मांस खाणाऱ्या मुलांइतकेच होते. संशोधकांनी संशोधनात ९ हजार मुलांचा समावेश केला. यामध्ये एकूण २५० शाकाहारी मुलांचा समावेश होता. या मुलांची उंची, बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) आणि पोषण मांस खाणाऱ्या मुलांइतकेच होते; पण बीएमआयची गणना केली तेव्हा शाकाहारी मुलांचे वजन कमी असण्याची शक्यता ९४ टक्के भरल्याचे आढळून आले. ७९ टक्के शाकाहारी मुलांचे वजन योग्य असल्याचे संशोधनात आढळले.
मांसाहार करणाऱ्या ८७०० मुलांपैकी ७८ टक्के मुले वयानुसार योग्य असल्याचे संशोधनात आढळून आले. वयोमानानुसार कमी वजन असलेल्या मुलांकडे पाहिले असता केवळ तीन टक्के मांसाहारी मुलांचे वजन कमी असल्याचे आढळून आले.
या आधारावर शास्त्रज्ञांनी सांगितले की, शाकाहारी मुलांचे वजन कमी असण्याची शक्यता जास्त असते. मांसाहार करणाऱ्या मुलांचे वजन जास्त असू शकते. मांस खाणाऱ्या मुलांमध्ये लठ्ठपणा वाढण्याचा धोका अधिक असल्याचेही संशोधनात आढळून आले. शाकाहारात मुलांच्या विकासासाठी आवश्यक पोषकतत्वांचा अभाव असतो.
जास्त प्रमाणात शाकाहारी असल्यामुळे आशियातल्या मुलांचे वजन कमी असते. भारतातल्या मुलांच्या विकासाचे प्रमाण वेगळे आहे. या अभ्यासात सहभागी असलेले बालरोगतज्ज्ञ डॉ. जोनाथन मागुरी म्हणाले, भारत आणि अमेरिकेतल्या मुलांच्या विकासाचे प्रमाण वेगळे आहे. भारतातल्या पाच वर्षांच्या मुलीचे वजन १७ किलो, उंची १०८ सेंटीमीटर असायला हवी, असेही संशोधक सांगतात.
दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…
चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…
काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…
नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…
महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केला कुंभार यांचा सत्कार मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका…
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातल्या अखेरच्या टप्प्यातले मतदान उद्या होत असल्यामुळे वाहन चालनाच्या कोणत्याही प्रकारच्या…