इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यास मनाई

Share

पुणे (हिं.स.) इंद्रायणी नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्या निमित्त आळंदीत येणाऱ्या वारकरी, भाविक, नागरिकांनी पाणी प्राशन करून आचमन करू नये, असे आदेश पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहे.

संत ज्ञानेश्वर पालखीचे सोमवारी संध्याकाळी ०४ वाजता आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. कोरोना संकट काहीसे सरल्यानंतर यंदाच्या वर्षी निर्बंध शिथिल झाल्याने वारकरी, दिंडी, भाविक मोठ्या संख्येने या पालखी सोहळ्याला हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषद, पुणे जिल्हाधिकारी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येत आहेत.

भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने यात्रा कालावधीत प्रतिबंधात्मक उपाय योजना या अंतर्गत इंद्रायणी नदीचे दूषित झालेले पाणी नागरिकांना पिण्यासाठी मनाई करण्यात आली आहे तसेच नदी पात्रात कपडे धुण्यास सुद्धा मनाई करण्यात आली असून आळंदी नगरपरिषद प्रशासनाकडून परिसरात याबाबत जनजागृती करण्यासाठी फलक लावण्यात येणार आहेत.

Recent Posts

Cartoon characters : आपली मुलं कार्टून्सच्या माध्यमातून काय पाहताहेत?

आनंदी पालकत्व : डॉ. स्वाती गानू पूर्वी मनोरंजन हाच कार्टून्सचा मुख्य हेतू होता. तंत्रज्ञानातील बदलाने…

2 mins ago

Weekly horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, १९ ते २५ मे २०२४

साप्ताहिक राशिभविष्य, १९ ते २५ मे २०२४ सहलीचे आयोजन कराल मेष : आपल्या कार्यक्षेत्रात खूप…

7 mins ago

Travel : प्रवास…

हलकं-फुलकं : राजश्री वटे प्रवास... कुठून सुरू होतो... कुठे संपतो...! कसा सुरू होतो... कसा संपतो...!!…

15 mins ago

मोबाइलसाठी गर्दुल्ल्याने घेतला पोलिसाचा जीव

क्राइम : अॅड. रिया करंजकर देशामध्ये आज बिकट परिस्थिती चालू आहे. सुशिक्षित बेरोजगारी वाढत असून,…

19 mins ago

युद्ध शांती अंतत: विश्वशांती ! (भाग-१)

निसर्गवेद : डॉ. महालक्ष्मी वानखेडकर कुटुंबातील कलहापासून ते विश्व महायुद्धापर्यंत ही सर्व युद्ध का होतात?…

27 mins ago

Death : मृत्यू अटळ सत्य…

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे मरणाचे स्मरण असावे जन्म आणि मृत्यू सत्य, असत्य, दिवस-रात्र अमावस्या, पौर्णिमा,…

32 mins ago