अहमदनगर : राष्ट्रीय महामार्गांची दुरूस्ती करावी, या मागणीसाठी पारनेर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण (hunger strike) सुरू केले होते. हे उपोषण अखेर आज चौथ्या दिवशी राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत मागे घेण्यात आलं आहे. अजित पवार हे उपोषणस्थळी आल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांशी रस्त्याच्या कामासंदर्भात चर्चा केली. तसंच त्यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी फोन करून संवाद साधला.
निलेश लंके यांच्याशी देखील नितीन गडकरी यांनी फोन वरून चर्चा केली. गडकरींकडून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर अजित पवार यांच्या उपस्थितीत निलेश लंके यांनी आपले उपोषण मागे घेतले.
अहमदनगर-पाथर्डी, अहमदनगर ते कोपरगाव आणि अहमदनगर ते करमाळा-टेंभुर्णी या रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी आमदार निलेश लंके यांनी केली होती. यासंबंधी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या उत्तरावर समाधान न झाल्याने मागील चार दिवसांपासून ते उपोषण करत होते. जोपर्यंत वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी ठोस शब्द देत नाहीत, तोपर्यंत मी मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.
आनंदी पालकत्व : डॉ. स्वाती गानू पूर्वी मनोरंजन हाच कार्टून्सचा मुख्य हेतू होता. तंत्रज्ञानातील बदलाने…
साप्ताहिक राशिभविष्य, १९ ते २५ मे २०२४ सहलीचे आयोजन कराल मेष : आपल्या कार्यक्षेत्रात खूप…
हलकं-फुलकं : राजश्री वटे प्रवास... कुठून सुरू होतो... कुठे संपतो...! कसा सुरू होतो... कसा संपतो...!!…
क्राइम : अॅड. रिया करंजकर देशामध्ये आज बिकट परिस्थिती चालू आहे. सुशिक्षित बेरोजगारी वाढत असून,…
निसर्गवेद : डॉ. महालक्ष्मी वानखेडकर कुटुंबातील कलहापासून ते विश्व महायुद्धापर्यंत ही सर्व युद्ध का होतात?…
मनस्विनी : पूर्णिमा शिंदे मरणाचे स्मरण असावे जन्म आणि मृत्यू सत्य, असत्य, दिवस-रात्र अमावस्या, पौर्णिमा,…