देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून केंद्र सरकारचे वाभाडे काढणारे भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा भाजपची कोंडी करणारे वक्तव्य केले आहे.
नवी दिल्ली- देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून केंद्र सरकारचे वाभाडे काढणारे भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा भाजपची कोंडी करणारे वक्तव्य केले आहे. काश्मीर मुद्दय़ावर तोडगा काढायचा असेल तर पाकिस्तानशी चर्चा करावीच लागेल, असं वक्तव्य सिन्हा यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
‘दि वायर’ या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत यशवंत सिन्हा यांनी हे वक्तव्य केलं आहे. जम्मू काश्मीरमधील लोक स्वत:ला एकटं समजत आहेत. ही गोष्ट मला वेदना देते. आपण त्यांना भावनिकदृष्टय़ा गमावून बसलो आहोत. हे समजून घेण्यासाठी आपल्याला काश्मीर खोऱ्याचा दौरा केला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. काश्मीर प्रश्न सोडवायचा असेल तर यात दुर्दैवाने पाकिस्तान तिसरा पक्ष (थर्ड पार्टी) असेल. या प्रश्नावर अंतिम तोडगा हवा असेल तर पाकिस्तानला त्यात सहभागी करून घ्यावेच लागेल.
हो, पण तुम्ही हा प्रश्न आणखी ताणून ठेवू शकत नाही, असंही सिन्हा यांनी या मुलाखतीत स्पष्ट केले. नियंत्रण रेषेवरील लोकांना ठार मारले जात आहे. त्याला पायबंद घातला पाहिजे. कारण तिथे कोणीच युद्ध जिंकत नाहीये. नियंत्रण रेषेच्याबाबतीत जग पाकिस्तान सोबत नाही, तर आपल्या सोबत आहे. तुम्ही नियंत्रण रेषा बदलू शकत नाही. त्यामुळे नियंत्रण रेषेवर शांतता का असू नये? पाकिस्तानशी मतभेद असतानाही नियंत्रण रेषेवर शांती निर्माण होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. काश्मीर मुद्यायावर चर्चा करण्यासाठी सिन्हा यांनी दहा महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वेळ मागितला होता. पण त्यांना मोदींनी अजूनही वेळ दिलेला नाही. त्यावर सिन्हा यांनी दु:ख व्यक्त केले. मी दु:खी आहे.
निश्चितच मी दु:खी आहे. राजकारणात आल्यापासून राजीव गांधींपासून कोणत्याही पंतप्रधानांनी मला भेटण्यास नकार दिलेला नाही. माझ्याकडे तुम्हाला भेटायला वेळ नाही, असे कोणताच पंतप्रधान मला म्हणालेला नाही. इथे तर माझेच पंतप्रधान आहेत. ते मला वेळ देत नाहीत. आता मला फोन करून बोलावणे आले तरी मी जाणार नाही. कारण वेळ निघून गेली आहे. मला चांगली वागणूक दिलेली नाही, असे सिन्हा यांनी सांगितले. तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये यशवंत सिन्हा यांचे अर्थमंत्रीपद काढून त्यांना परराष्ट्र मंत्री करण्यात आले होते. ही त्यांची पदावनती होती, अशी टीका केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केली होती. त्याबाबत विचारले असता, मग आता सुषमा स्वराज महत्त्वहीन खाते सांभाळत आहेत असे जेटलींना म्हणायचे आहे का?, असा सवालही त्यांनी
[EPSB]
श्रीनगर येथील बीएसएफ कॅम्पवर दहशतवाद्यांचा हल्ला
चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान, बीएसएफचा एक जवान शाहिद
[/EPSB]