राज्यातील दहा महापालिका, २५ जिल्हा परिषदा आणि २८३ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी येत्या २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
मुंबई- राज्यातील दहा महापालिका, २५ जिल्हा परिषदा आणि २८३ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी येत्या २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. नागरिकांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून या दिवशी राज्य निवडणूक आयोगाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
तशी अधिसूचना निवडणूक आयोगाने काढली आहे. मुंबईसह ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर या १० महापालिकांसाठी मंगळवारी २१ फेब्रुवारी रोजी मतदान आहे.
तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह ११ जिल्हा परिषदांकरिता व त्याअंतर्गत येणा-या ११८ पंचायत समित्यांच्या क्षेत्रातही मतदान होणार आहे.