जिल्हा पुरवठा विभागाकडून धान्य उचल करणा-या वाहतुकदार गाडय़ांची गेले दोन महिने वाहतुकीची बिले दिली नसल्याने वाहतुकदार संघटनेने पुकारलेला संप अद्याप सुरू असून जोपर्यंत वाहतुकीची रक्कम मिळत नाही तोपर्यंत गोडावूनमधून धान्य उचल करायची नाही, असा इशारा वाहतुकदारांनी दिला आहे.
कुडाळ- जिल्हा पुरवठा विभागाकडून धान्य उचल करणा-या वाहतुकदार गाडय़ांची गेले दोन महिने वाहतुकीची बिले दिली नसल्याने वाहतुकदार संघटनेने पुकारलेला संप अद्याप सुरू असून जोपर्यंत वाहतुकीची रक्कम मिळत नाही तोपर्यंत गोडावूनमधून धान्य उचल करायची नाही, असा इशारा वाहतुकदारांनी दिला आहे.
गोडावूनमधून धान्य उचल करण्यासाठी नियमानुसार टेंडर काढले जाते. यात अटी, शर्थीच्या अधीन राहून धान्य उचल करावयाची असते. दर महिन्याच्या १० तारीखला वाहतुकदारांची रक्कम देणे पुरवठा विभागाला बंधनकारक असताना पुरवठा विभागाच्या मनमानी कारभारामुळे दोन दोन महिने वाहतुकदारांना रक्कम मिळत नाही. आधीच कमी दरात असलेल्या टेंडरमुळे वाहतुकदार कसेबसे चरितार्थ चालवतात. आज हक्काची गाडी कामाला आहे असे गृहीत धरून काम करणा-या ट्रक चालकांना पुरवठा विभागाच्या कारभाराने रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.
गोडावून किपर असला तर हमाल नसतात. मग गाडय़ा किती दिवस माल भरून उभ्या करून ठेवाव्यात. एकाही शाासकीय गोडावूनमध्ये वॉचमन नाही. गाडीतील माल उतरल्याशिवाय चालकाला गाडी सोडून जात येत नाही. अनेकवेळा पुरवठा विभागाला विनंत्या करूनही गाडय़ा वेळेवर भरण्यास गोडावून किपरकडून चालढकलपणा केला जातो. आज जिल्हा ट्रक चाकल मालक संघटनेच्या ४२ गाडय़ा या जिल्हा पुरवठा शाखेकडे शासकिय गोडावूनमध्ये मालाची ने-आण करण्याकरीता गाडय़ाची व्यवस्था केली आहे.
आधीच अल्पदरात वाहतुक करायची व त्या वाहतुकीची बिले जर दोन-दोन महिने मिळत नसतील तर पैसे कोठून आणायचे व वाहतुक कशी करायची याचे मार्गदर्शन पुरवठा विभागानेच करावे असेही या ट्रक चालकांनी सांगितले. प्रत्येक ठिकाणी भाडे व डिझेल यासाठी आम्ही रोख पैसे मोजतो व ते सुध्दा मिळत नसतील तर धान्याची उचल करायची कशाला? असा सवाल या संघटनेच्या पदाधिका-यांनी विचारला आहे.
जिलतील धान्यसाठा करायच्या एकाही शासकीय गोडावूनला वॉचमन नाही. शुक्रवारी माल भरला तर सोमवारी गाडी खाली करावी लागते. इतके दिवस उभ्या राहिलेल्या गाडय़ाची ड्रॉयव्हर व कामाच्या खोटीची रक्कम कोण देणार? एकीकडे गोडावून मध्ये तीन माणसाची गरज असताना गोडावून किपर एकटाच असतो. माल चढविणे व उतरविण्यासाठी हमाल नसतात.
सकाळी आणलेली गाडी खाली करण्यास दुपार होते. या सर्व व्यवस्थेला जिल्हा पुरवठा विभाग जबाबदार असून याची जिल्हाधिकारी यांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी या ट्रक चालक मालकांनी केली आहे. आज या आंदोलन स्थळी सावंतवाडी, ट्रकचालक मालक संघटनेचे अध्यक्ष बावतीस फर्नाडीस, उपाध्यक्ष गुरूनाथ वालावलकर, सोहेल खान, बाबल पावसकर, भाई तळेकर, प्रथमेश मर्गज, ऑलविन फर्नाडीस, साई वराडकर, श्री. पिंगुळकर, दिपक चव्हाण, गौतम कदम, शरद धुरी, नाझिर शेख, तुळशिदास शेलटे, माजी अध्यक्ष गोविंद वाटवे, विजय मालडीकर, उमर मुल्ला आदी सहभागी होते.
[EPSB]
[/EPSB]