संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत पाकिस्तानवर तीक्ष्ण शब्दांत सुनावणी करणा-या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना चिनी मीडियानं ‘उद्धट’ असे म्हटले आहे.
बीजिंग- संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत पाकिस्तानवर तीक्ष्ण शब्दांत सुनावणी करणा-या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना चिनी मीडियानं ‘उद्धट’ असे म्हटले आहे. यावरुन पुन्हा एकदा चीनने पाकिस्तानला समर्थन दिल्याचे दिसत आहे. चिनी मीडियाने आरोप करत म्हटले की, गेल्या काही वर्षांमध्ये झालेला आर्थिक विकास आणि परदेशी संबंधांवरून भारत पाकिस्तानला कमी लेखत आहे.
या आरोपासोबत चीनने पाकिस्तानातील दहशतवादाची बाबदेखील स्वीकारली आहे. सुषमा स्वराज यांनी दहशतवादाच्या मुद्यावरुन पाकिस्तानला फटकारत म्हटले होते की, भारतात आयआयटी आणि आयआयएम स्थापन करण्यात आलेत तेथे पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटना तयार करण्यात आल्या.
सुषमा स्वराज यांच्या या विधानावरुन चीनच्या सरकारी मीडियानं, भारताचा व्यवहार हा पक्षपाती असल्याचा कांगावा केला आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सच्या संपादकीयमध्ये असे लिहिण्यात आले आहे की, पाकिस्तानात दहशतवाद आहे, मात्र दहशतवादाचे समर्थन करणं हे देशाचे धोरण आहे का? दहशतवादामुळे पाकिस्तानला काय फायदा होणार आहे? पैसा की सन्मान?, असे प्रश्न उपस्थित करत चीननं पुन्हा एकदा पाकिस्तानचं समर्थन केले आहे.
‘इंडियाज बिगट्री नो मॅच फॉर इट्स अॅम्बिशन’ असे शीर्षक असलेल्या संपादकीयमध्ये चिनी मीडिया असेही लिहिले आहे की, गेल्या काही वर्षात झालेल्या अर्थव्यवस्थेचा विकास आणि परदेशी संबंधांवरून भारत पाकिस्तानला कमी लेखत आहे आणि चीनलाही अहंकार दाखवत आहे, असेही चिनी मीडियानं म्हटले आहे.
[EPSB]
‘ऑपरेशन अर्जुन’मुळे पाकने टेकले गुडखे
[/EPSB]