राज्यात उकाडा वाढलेला असतानाच कोळशाच्या उपलब्धतेचे आणि पुरवठय़ाचे कारण पुढे करीत महावितरण राज्यात महावितरण कंपनीने भारनियम करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
मुंबई- राज्यात उकाडा वाढलेला असतानाच कोळशाच्या उपलब्धतेचे आणि पुरवठय़ाचे कारण पुढे करीत महावितरण राज्यात महावितरण कंपनीने भारनियम करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने विहीत असलेल्या पाण्यावर पिके जगविण्याची शेतक-यांची धडपड सुरू असतानाच हे भारनियम जाहीर केल्याने शेतक-यांमधूनही संताप व्यक्त केला जात आहे. महावितरण कंपनीने भारनियम करीत असल्याचे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. त्यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे की, वीज निर्मिती केंद्रांना कोळशाच्या उपलब्धतेत व पुरवठय़ात अडचणी येत असल्यामुळे राज्यात तात्पुरते भारनियमन करण्यात येत आहे.
हे भारनियमन तात्पुरत्या स्वरूपाचे असून विजेची जादा हानी असलेल्या E व G गटांतील वाहिन्यांवर गरजेनुसार केले जात असून या काळात ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे. आपल्या खुलाशात महावितरण म्हटले आहे की, वीज निर्मिती कंपन्यांसोबत झालेल्या करारानुसार महावितरणला महानिर्मिती कंपनीकडून सुमारे ७००० मे.वॉ. व मे. अदानी कडून ३०८५ मे.वॅ. वीज मिळणे अपेक्षित आहे. मात्र कोळशाची उपलब्धता व पुरवठय़ात आलेल्या अडचणींमुळे महानिर्मितीकडून सुमारे ४५०० मे.वॅ. व मे. अदानी कंपनीकडून १७०० ते २००० मे.वॅ. इतकीच वीज मिळत आहे. मे. एम्को व सिपतकडूनही २०० मे.वॅ. व ७६० मे.वॅ. मिळण्याऐवजी अनुक्रमे १०० व ५६० मे.वॅ. इतकीच वीज मिळत आहे.
विजेची उपलब्धता वाढविण्यासाठी महावितरण सर्वतोपरी प्रयत्न करत असून लघू निविदेद्वारे खुल्या बाजारातून ३९५ मे.वॅ. वीज खरेदी केली आहे. ती वीज एक ते दोन दिवसांत जाळ्यात उपलब्ध होईल. तसेच पॉवर एक्स्चेंजमधूनही वीज खरेदीसाठीचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु या ठिकाणीही वीज उपलब्ध नसून ती वीज महागडी आहे. विजेची उपलब्धता होईपयर्ंत जादा वीज हानी असलेल्या E व G गटांतील वाहिन्यांवर गरजेनुसार आपत्कालीन व तात्पुरत्या स्वरूपाचे भारनियमन नाईलाजास्तव करावे लागत आहे, असे महावितरण म्हटले आहे.
[EPSB]
वातावरणातील उकाडा वाढल्याने मुंबईकर हैराण!
मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर येथील वातावरणातील उकाडा चांगलाच वाढला आहे. महत्त्वाचे म्हणजे उष्ण वारे, वाढती आद्र्रता यामुळे मुंबईतील वातावरण अत्यंत उष्ण झाले आहे.
[/EPSB]