हिजबूल मुजाहिद्दीनचा कमांडर बु-हान वनी याचा खात्मा केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये तरुणांचा दहशतवादाकडे कल वाढला असल्याची धक्कादायक बातमी हाती येत आहे.
नवी दिल्ली- हिजबूल मुजाहिद्दीनचा कमांडर बु-हान वनी याचा खात्मा केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये तरुणांचा दहशतवादाकडे कल वाढला असल्याची धक्कादायक बातमी हाती येत आहे. २०१६ मध्ये किमान ८८ तरुण दहशतवादी बनले. काश्मिरात २०१०नंतर दहशतवादी संघटनेत सामील होण्याचा तरुणांची हा सर्वात मोठी संख्या आहे.
हिजबूल मुजाहिद्दीन या संघटनेचा कमांडर बुऱ्हान वनी याचा चकमकीत मृत्यू झाल्यानंतर काश्मीर खो-यात हिंसक निदर्शने झाली. जुलै ते सप्टेंबर २०१६ मध्ये २१०० हून अधिक दंगली घडल्या होत्या. तर, गेल्या वर्षी म्हणजेच २०१६ मध्ये ८८ काश्मिरी तरुण दशहतवादी संघटनेत सामील झाले.
तरूणांनी २०१४मध्ये दहशतवादाकडे कानाडोळा करत असल्याचे चित्र होते. २०१६ पासून खो-यामध्ये दगडफेकीच्या घटना वाढल्या. दहशतवादी संघटनामधून अनेक तरुण भरती झाल्याचे उघड झाले.
दरम्यान, लोकसभेत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीरमध्ये २०१५ मध्ये ६६,२०१४ मध्ये ५३,२०१३ मध्ये १६, २०१२ मध्ये २१, २०११ मध्ये २३ आणि २०१० मध्ये ५४ तरुणांनी दहशतवादाचा मार्ग स्वीकाराला आहे. या तरुणांना दहशतवादापासून रोखण्याचा प्रयत्न सार्वजनिक स्तरावर पोलीस करत आहेत, असे हंसराज अहीर यांनी सांगितले.