जगातील शहरांमध्ये तणाव वाढत असून टॉप-२० मध्ये दिल्ली नवव्या स्थानी आहे. मुंबई १३, कोलकाता १९ आणि बंगळुरू २० व्या स्थानी आहे.
लंडन- जगातील शहरांमध्ये सर्वाधिक तणाव वाढत आहे. यातही काही शहरांमध्ये ताणतणावाची सीमाच कमालीची वाढली आहे. याबाबत झालेल्या एका अध्ययनात रोचक बाबी समोर आल्या आहेत. टॉप-२० तणावग्रस्त शहरांत भारतातील चार शहरे आहेत.
टॉप-२० मध्ये दिल्ली नवव्या स्थानी आहे. मुंबई १३, कोलकाता १९ आणि बंगळुरू २० व्या स्थानी आहे. पहिल्या क्रमांकावर इराकची राजधानी बगदाद, दुस-या स्थानी काबुल आहे. ढाका ७ व कराची ८ व्या स्थानी आहे.
दुसरीकडे, सर्वात कमी तणाव असलेल्या शहरांत जर्मनीचे स्टुटगार्ट शहर प्रथम स्थानी असून लॅक्झेंबर्ग सिटी दुस-या व व्हॅनोव्हर तिस-या स्थानी आहे.
जिपजेट या ब्रिटनच्या ड्राय क्लिनिंग व लाँड्री सव्र्हिस कंपनीने जगातील १५० शहरांत हे अध्ययन केले. या शहरांतील ५०० पेक्षा जास्त जागांहून १७ श्रेणींतील आकडेवारी जमा करण्यात आली.
मानसिक शांतता, बँक बॅलन्स व नोकरीच्या सुरक्षिततेबाबत जर्मनी सर्वोत्तम ठिकाण आहे. टॉप-१० कमी तणावाच्या शहरांत जर्मनीची चार शहरे आहेत. युरोपबाहेरील केवळ सिडने याच शहराचा समावेश आहे. स्टुटगार्टमधील नागरिक सर्वाधिक चिंतामुक्त आहेत. हे शहर पोर्शे, बॉश व मर्सिडिझ बेंझसारख्या कंपन्यांचे घर आहे. येथे सर्वाधिक हरित पट्टे आहेत.
स्थानिकांनुसार हिरवळीमुळे तणाव कमी होण्यास मदत मिळते. आर्थिक व वैयक्तिक सुरक्षाही सर्वोत्तम आहे. दुसरीकडे, सिंगापूर व तैपेईत राहणारे लोक सर्वाधिक संतुष्ट आहेत.
सर्वाधिक सुरक्षित ठिकाणांत अबूधाबी, व जपानचे ओसाका शहर पहिल्या-दुस-या स्थानी आहे. एकूण लक्षात घेतले तर शहरवासीयांना विविध समस्यांनी ताणतणाव दिला आहे. मात्र नैसर्गिक स्थळांनी मानसिक शांती दिली आहे.