तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा अजून सुटला नाही. राज्यपालांनी शपथविधीसाठी शशिकला यांना अजून तरी आमंत्रित केलेले नाही.
चेन्नई- तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा अजून सुटला नाही. राज्यपालांनी शपथविधीसाठी शशिकला यांना अजून तरी आमंत्रित केलेले नाही. प्रभारी राज्यपाल विद्यासागर राव मुंबईहून चेन्नईला आल्यानंतर आता ते घटना आणि लोकशाहीला न्याय देतील अशी अपेक्षा शशिकला यांनी व्यक्त केली.
सध्या चेन्नईमध्ये ना जयललिता अम्माचे सरकार आहे, ना द्रमुक पक्षाचे सरकार आहे, अशी स्थिती असल्याचे शशिकला यांनी म्हटले आहे.
श्रीमती शशिकला यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा आपला दावा सादर केला. ५ फेब्रुवारी रोजी द्रमुक पक्षाच्या विधानमंडळ नेतेपदी शशिकला यांची निवड झालेली आहे.
त्याचवेळी मुख्यमंत्री ओ. पन्निरसेलम यांनी पदाचा राजीनामा सादर केला होता, दरम्यान द्रमुकचे एम. के. स्टॅलिन यांनी राज्यपालांची भेट घेऊन सभागृहात मतदानाने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.