नोएडामध्ये २००८ मध्ये झालेल्या बहुचर्चित आरुषी आणि हेमराज हत्याकांडप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने आरुषीचे आई-वडील राजेश आणि नूपुर तलवार यांची सबळ पुराव्याअभावी गुरुवारी निर्दोष मुक्तता केली आहे.
नवी दिल्ली- नोएडामध्ये २००८ मध्ये झालेल्या बहुचर्चित आरुषी आणि हेमराज हत्याकांडप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने आरुषीचे आई-वडील राजेश आणि नूपुर तलवार यांची सबळ पुराव्याअभावी गुरुवारी निर्दोष मुक्तता केली आहे.
जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या तलवार दाम्पत्याने अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सीबीआय न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राजेश आणि नूपुर तलवार यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात अपील केले होते. दरम्यान, निकालाची प्रत हाती आल्यानंतर पुढील निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया सीबीआयने निकालानंतर दिली.
न्यायालयाच्या या निर्णयावर तलवार दाम्पत्य खूश असल्याचे डासना तुरूंगाचे तुरूंगाधिकारी डॉ. मौर्य यांनी माध्यमांना सांगितले. गाझियाबाद स्थित सीबीआयच्या विशेष न्यायालयाने २६ नोव्हेंबर २०१३ मध्ये राजेश आणि नुपूर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. हे दोघेही सध्या गाझियाबाद येथील डासना तुरूंगात शिक्षा भोगत आहेत. उच्च न्यायालयात राजेश आणि नुपूर यांना मुलगी आरूषी आणि त्यांचा नोकर हेमराज यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्याच्या निर्णयाला आव्हान देणा-या अपिलावर एक ऑगस्ट २०१७ रोजी पुन्हा एकदा सुनावणी सुरू झाली.
न्या. बालकृष्ण नारायण आणि न्या. अरविंद कुमार मिश्र यांच्या खंडपीठाने सीबीआयच्या आरोपपत्रातील विरोधाभासामुळे या प्रकरणाची पुन्हा सुनावणी करणार असल्याचे म्हटले होते. न्या. नारायण आणि न्या. मिश्रा यांच्या खंडपीठाने ७ सप्टेंबर रोजी आपला निर्णय सुरक्षित ठेवला होता. देशभरातील माध्यमांमध्ये चर्चिल्या गेलेल्या या प्रकरणामुळे उत्तर प्रदेश पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले होते.
[EPSB]
भांडुप प्रभागातील पोटनिवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय
मुंबई महापालिकेच्या भांडुपमधील प्रभाग क्रमांक ११६ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या जागृती पाटील यांनी बाजी मारली आहे.
[/EPSB]