आयुर्वेदिक उपचाराची पदवी असणाऱ्या डॉक्टरने अॅलोपॅथीची औषधे व इंजेक्शन दिल्यामुळे एका १६ वर्षीय विद्याíथनीला प्राण गमवावे लागल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे.
उल्हासनगर- आयुर्वेदिक उपचाराची पदवी असणा-या डॉक्टरने अॅलोपॅथीची औषधे व इंजेक्शन दिल्यामुळे एका १६ वर्षीय विद्याथनीला प्राण गमवावे लागल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे. मुलीचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप विद्यार्थिनीच्या पालकांनी
केला आहे.
रविवारी २७ ऑगस्ट रोजी धोबीघाट शास्त्रीनगर येथे राहणाऱ्या एका १६ वर्षीय सिमरन शर्मा हिला ताप आला होता. तिने दोन दिवसांपासून नजीकच्या डॉक्टरांकडून उपचार घेतल्यानंतरही काही एक फरक न पडल्याने पालकांनी तिला पंजाबी कॉलनी येथील प्रवेश शर्मा या डॉक्टरांकडे नेले. शर्मा याने दुपारी साडे चार वाजताच्या सुमारास सिमरनला वेगवेगळी तीन इंजेक्शन तासाभरात दिली.
त्यामुळे तिची प्रकृती जास्तच गंभीर झाल्याने तिला त्रिमूर्ती हॉस्पिटलमध्ये पाठवले. तिथे तिला आणखी दोन इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर तिला क्रिटिकेयर रुग्णालयात पाठविले असता तिला सायंकाळी साडे सात वाजता मृत घोषित करण्यात आले. मृत झाल्यावर सिमरनच्या तोंडातून फेस येत होता, यामुळे तिचा मृत्यू तापामुळे नसून डॉक्टरांच्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळे झाला असल्याचा आरोप सिमरनचे वडील शंभू शर्मा यांनी
केला आहे.
याबाबत नगरसेविका सविता तोरणे यंनी सांगितले की दुपारी साडेचार वाजता चालत रुग्णालयात आलेली सिमरन सायंकाळी साडेसात वाजता फक्त तापामुळे मृत कशी होऊ शकते, यासाठी मध्यवर्ती रुग्णालयात नेत आम्ही तिचे शवविच्छेदन करून घेतले. डॉ. प्रवेश शर्मा याच्याकडे आयुर्वेदिकची डिग्री असून तो अॅलोपॅथीचे औषध देतो, ही बाब गंभीर असून अशा डॉक्टरांवर कारवाईची मागणी सविता तोरणे यांनी महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्याकडे केली आहे.
[EPSB]
[/EPSB]