मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स मंगळवारी ५२१ अंकांनी वधारल्यानंतर बुधवारी तो ६६ अंकांनी घसरला.
मुंबई- मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स मंगळवारी ५२१ अंकांनी वधारल्यानंतर बुधवारी तो ६६ अंकांनी घसरला. तर निफ्टी १८.८० अंकांनी घसरून ८६५९.१० अंकावर बंद झाला.
बाजारात बुधवारी नफेखोरी करण्यात आली. युरोपियन मध्यवर्ती बॅँकेची बैठक बुधवारी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जगात अस्थिरता होती.
जीएसटी परिषदेच्या सकारात्मक निर्णयाचाही प्रभाव बाजारावर पडू शकला नाही, असे जिओजित परिबाज फायनान्शियल सव्र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले.
चिनी अर्थव्यवस्थेचा विस्तार होत असल्याचे संकेत मिळाल्याने आणि तिस-या तिमाहीचे निकाल अधिक चांगले लागण्याच्या आशेने बाजारात सकारात्मक वातावरण होते. आयसीआयसीआय बॅँक, हिरोमोटो कॉर्प, हिंदुस्थान युनिलिव्हर, एसबीआय, एशियन पेंटस, विप्रो, लुपिन, अदानी पोर्टस्, गेल, पॉवरग्रीड, सनफार्मा, ओएनजीसी, एनटीपीसी, डॉ. रेड्डी आदी कंपन्यांचे समभाग वधारले.
जीएसटी परिषदेत तंबाखू व आरामदायी वस्तूंवर ‘पाप’कर लावण्याबरोबरच आणि बहुउद्देशीय कर लावण्याचा विचार करत आहे. त्यामुळे आयटीसी या बडय़ा कंपनीच्या समभागाला मोठा फटका बसला.