भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे उत्तर निवडणूक आयोगाला पाठवले आहे.
नवी दिल्ली- भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे उत्तर निवडणूक आयोगाला पाठवले आहे.
देशाची लोकसंख्या वाढत असल्याबाबत त्यांनी काही दिवसांपूर्वी वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस पाठवली होती. त्याच्या उत्तरादाखल त्यांनी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हटले आहे.
देशाची लोकसंख्या वाढत असून यास हिंदू लोक नव्हे, तर चार पत्नी आणि ४० मुले असलेले लोक जबाबदार आहेत, असे वक्तव्य साक्षी महाराजांनी केले होते.
मेरठ येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. मात्र त्यांनी वक्तव्य केले तेव्हा उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली होती.
त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस पाठवत खुलासा मागवला होता. बुधवारी सकाळपर्यंत त्यांच्याकडून उत्तर अपेक्षित होते. त्यानंतर साक्षी महाराजांनी निवडणूक आयोगाला उत्तर देत मी माझ्या वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हटले आहे.
हिंदूंचीही १० मुले असतात, कुठल्याही समुदायाचे मी नाव घेतले नव्हते. त्यामुळे माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला जात असल्याचे साक्षी महाराज यांनी म्हटले आहे.