रोहिंग्या मुसलमान हे देशासाठी धोकादायक आहेत. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांशी त्यांचे संबंध असून कोणत्याही परिस्थितीत त्यांना भारतात राहू दिले जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. तसे प्रतिज्ञापत्रच केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे.
नवी दिल्ली- रोहिंग्या मुसलमान हे देशासाठी धोकादायक आहेत. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांशी त्यांचे संबंध असून कोणत्याही परिस्थितीत त्यांना भारतात राहू दिले जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. तसे प्रतिज्ञापत्रच केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे.
म्यानमारमध्ये सुरू असलेल्या लष्करी कारवाईमुळे रोहिंग्या मुसलमान तो देश सोडून अन्य देशांच्या आश्रयाला जात आहेत. २०१२ पासून रोहिंग्या मुसलमान भारतात येत असून त्यांची संख्या ४० हजारांपर्यंत असल्याचे बोलले जात आहे. या बेकायदा शरणार्थीना भारतातून हुसकावून लावण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे.
त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर उत्तर देताना केंद्राने आज १५ प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रकरणी पुढील सुनावणी ३ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
प्रतिज्ञापत्रात सरकार म्हणते.
भारतातील बेकायदा रोहिंग्यांकडं संयुक्त राष्ट्रसंघाची कसलीही कागदपत्रे नाहीत. त्यांना भारतात राहण्याची परवानगी दिली जाणार नाही.
मध्यस्थांच्या मदतीनं भारत-म्यानमार सीमा पार करून हे लोक भारतात आले आहेत.
बेकायदा रोहिंग्यामुळं देशातील काही भागांत लोकसंख्येचा समतोल बिघडण्याची शक्यता आहे.
भारतात घुसलेले अनेक रोहिंग्या हवाला, मानवी तस्करीसारख्या बेकायदा व देशविरोधी कारवायांमध्ये सामील आहेत.
दहशतवादाकडं आकर्षिले गेलेले काही दिल्ली, हैदराबाद, मेवाड व काश्मीरमध्ये सक्रिय आहेत.
भारतातील अनेक रोहिंग्यांनी बेकायदेशीरपणे मतदान ओळखपत्र व पॅनकार्ड बनवली आहेत. त्याचा वापार हवालामार्गे पैसे जमवण्यासाठी केला जातो.
पाकच्या आयएसआय तसंच, इस्लामिक स्टेटशी रोहिंग्यांचे संबंध असल्याचे पुरावे गुप्तचर यंत्रणांकडे आहेत.
पुढील सुनावणीच्या आधी रोहिंग्यांच्या बेकायदा कारवायांविरोधात सर्व पुरावे सादर केले जातील.
रोहिंग्यामुळे धोका नाही – ओमर
कश्मीर : रोंहिग्या मुसलमानांपासून देशाला कोणताच धोका नसल्याचा दावा जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केला आहे. ओमर अब्दुल्ला यांनी एक ट्विट करून हा दावा केला आहे. रोहिंग्यापासून जम्मू-काश्मीरला धोका असल्याची ही बाब २०१४ पूर्वीची आहे. हेड क्वार्टसमध्ये वेळोवेळी झालेल्या बैठकांमध्ये रोहिंग्याचा धोका असल्याचा असा कोणताही अहवाल गुप्तचर विभागाने सादर केलेला नाही, असे अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले आहे.
[EPSB]
शाळा म्हणजे सरस्वतीचे मंदिर. या मंदिरातून ज्ञानार्जन करून निघालेला विद्यार्थी जगात कुठेही गेला तरी तो ताठ मानेने उभा राहील, असा आत्मविश्वास त्याच्या मनात निर्माण होतो. पण, आताच्या शाळा, त्यांची वसतिगृहे आणि आश्रमशाळा ही खरोखरच ज्ञानमंदिरे आहेत का, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे.
[/EPSB]