देशात यंदा ऊस गळीत हंगामात साखरेचे उत्पादन कमीच आहे.
कोल्हापूर– देशात यंदा ऊस गळीत हंगामात साखरेचे उत्पादन कमीच आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या काळात बाजारात साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर कारखान्यांवर स्टॉकचे लिमिट आणले आहे.
रामविलास पासवान यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली.
साखर कारखान्यांवरील निर्बंधांमुळे कारखान्यांकडे उपलब्ध साखरेच्या साठय़ांपैकी सप्टेंबर महिन्यात फक्त २१ टक्के साखर ठेवता येणार आहे. तर ऑक्टोबर महिन्यात ८ टक्के साखरेचा साठा करता येणार आहे. गेल्या ऊस गळीत हंगामात, राज्यात साखरेचे उत्पादन ४२ लाख मेट्रिक टन झाले होते. २०१५-१६ च्या तुलनेत हे उत्पादन अर्धेच होते. तर यंदा २०१६-१७ मध्येही देश पातळीवर ऊस गळीत हंगामात साखरेचे उत्पादन कमीच आहे. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी स्टॉकच लिमिट निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, या वर्षीच्या गळीत हंगामात कोल्हापुरात ऊसाला पहिल्या साडे नऊ टक्के रिकव्हरीला २५५० रुपये प्रति टन एफआरपी मिळणार आहे. त्यामुळे जर साखरेचे दर घसरले तर पुढे एफआरपी देण्यास अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे याचे दूरगामी परिणाम साखर कारखान्यांनाच भोगावा लागणार असल्याने, कारखानदारांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
[EPSB]
भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ एप्रिल ते जून २०१७ या तिमाहीमध्ये ५.७ टक्के इतकी झाली आहे.
[/EPSB]