‘तृतीयपंथी व्यक्ती या स्त्री अथवा पुरूष नसतात. त्यामुळे त्यांनी साड्या नेसणे सोडून द्यावे,’ असे वादग्रस्त विधान रामदास आठवले यांनी केले.
नवी दिल्ली- ‘तृतीयपंथी व्यक्ती या स्त्री अथवा पुरूष नसतात. त्यामुळे त्यांनी साड्या नेसणे सोडून द्यावे,’ असे वादग्रस्त विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. दिल्लीत एका कार्य़क्रमात ते उपस्थित होते.
दिल्लीत एका कार्य़क्रमात बोलत असताना त्यांनी नवा नाद ओढून घेतला आहे. तृतीयपंथी व्यक्तींबद्दल वादग्रस्त विधान केले. त्यानंतर आपण केलेले विधान चुकीचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ‘हा केवळ माझा सल्ला आहे. त्यांना हवा तो पोशाख परिधान करण्याचे त्यांना स्वातंत्र्य आहे,’ असे म्हणत आठवले यांनी सारवासारव केली.
मात्र या वादग्रस्त विधानामुळे त्यांना अनेकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. केंद्रीय मंत्रिपदावरील व्यक्ती इतक्या बेजबाबदारपणे कशी काय बोलू शकते? भारतीय घटनेने आम्हाला साड्या नेसायचा अधिकार दिलेला आहे आणि तो आमचा वैयक्तिक हक्क आहे, असे छत्तीसगडमधील तृतीयपंथी कल्याणकारी मंडळाच्या विद्या राजपूत यांनी म्हटलं आहे.