अयोध्येमध्ये विवादेत जागी राम मंदिर बांधायला मुस्लिमांचा नव्हे तर राजकारणी लोक आणि गुंडांचा विरोध आहे, अशी माहिती राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिली आहे.
रांची- अयोध्येमध्ये विवादेत जागी राम मंदिर बांधायला मुस्लिमांचा नव्हे तर राजकारणी लोक आणि गुंडांचा विरोध आहे, अशी माहिती राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिली आहे. भागवत यांच्या या विधानामुळे राम मंदिराचा मुद्दा परस्पर सहकायार्ने आणि समजूतीने सोडविण्यावर एकमत होत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
झारखंडच्या देवघरमध्ये बोलताना भागवता म्हणाले की, अयोध्येत राम मंदिर उभारणीला मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्मियाचा कधीच विरोध नव्हता. केवळ काही कट्टरतावादी राजकारणी आणि गुंड राम मंदिराला विरोध करत आहेत. राम मंदिराच्या वादावर कोर्टात तोडगा निघणार आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेल्या विधानाशी आपण सहमत आहोत, असेही ते म्हणाले.
काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने कोटार्बाहेर हा प्रश्न परस्पर सहकायार्नं सोडविण्याचे निर्देश दिले होते. राम मंदिरासारख्या संवेदनशील प्रकरणांवर परस्पर समजुतीने तोडगा काढल्यास योग्य होईल. जर असं झाल्यास कोर्टही मध्यस्थी करेल. दोन्ही पक्ष चचेर्साठी तयार असल्यास एखाद्या न्यायाधीशांना मध्यस्थाची भूमिका घ्यायला सांगितलं जाऊ शकतं. मी स्वत:ही यासाठी तयार आहे, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर यांनी दिली होती.