खराब रस्त्यांमुळे वारंवार आक्रोश करणा-या प्रवाशांना अलिबाग तालुक्यातील सातीर्जे येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र ठाकूर यांनी दिलासा दिला आहे.
अलिबाग- खराब रस्त्यांमुळे वारंवार आक्रोश करणा-या प्रवाशांना अलिबाग तालुक्यातील सातीर्जे येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र ठाकूर यांनी दिलासा दिला आहे. आजपासून स्वखर्चाने स्वत:च्या कंपनीची यंत्रसामुग्री व साहित्य वापरून खड्डेमय अलिबाग-रेवस मार्गाची दुरूस्ती सुरू केली. या कामाची सुरूवात आज धोकवडे येथील
ज्येष्ठ नागरिक तोडणकर गुरुजी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली. यावेळी रस्तेदुरूस्ती अॅक्टीव्हीस्ट दिलीप जोग यांच्यासह अनेक नागरिकांनी थांबून राजाभाऊ ठाकुर यांचे आभार मानले. यावेळी अनंत गोंधळी, सुनील थळे, योगेश मगर, चांदोरकर सर, किशोर सातमकर, अॅड. प्रथमेश पाटील, प्रसाद थळे उपस्थित होते. राजाभाऊ ठाकूर म्हणाले, अलिबाग पर्यटन दृष्टय़ा जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. परंतु, त्याला रस्त्यांच्या दुरवस्थचे ग्रहण लागले होते. प्रवासी प्रचंड संतप्त आहेत. सर्व प्रकारचे कर सरकारला देऊनही रस्त्यांच्या या दुरवस्थेने जनतेमध्ये मोठा रोष निमाण झाला होता.
जनतेला कोण वाली नाही अशी परिस्थिती उद्भवली होती. शासनाकडे सर्व राजकीय पक्ष, नागरिक,सामाजीक कार्यकर्ते, रिक्षा निमीडोअर चालक, वाहन चालक यांनी अनेक विनंती अर्ज केले. परंतु, काहीच कार्यवाही होत नाही हे पाहून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने मी हे रस्ते भरण्याचे काम सुरू केले अूसन अलिबाग तालुक्यातील प्रमुख मार्ग माझे परीने खड्डेमुक्त करण्याचा संकल्प केला असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.
सध्या परतीच्या पावसाने काही खड्डय़ांत पाणी आहे. पाऊस पूर्णपणे बंद झाल्यावर कामाचा वेग आणखी वाढणार आहे. खड्डे भरण्याचे काम हे वरचेवर नसून प्रथम खड्डय़ातील माती काढून खड्डा पूर्णपणे साफ करून त्यावर टॅककोटचा वापर करून तसेच गरज पडेल तशी एक नंबर, दोन नंबर व तीन नंबरची खडी व डांबर वापरून हे काम करण्यात येत आहे.
[EPSB]
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम कंत्राटदार बदलूनही पूर्ण होत नसल्याने राज्याचे गृहनिर्माणमंत्री तसेच रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, कामाच्या लवकर पूर्ततेसाठी या महामार्गाचे काम केंद्र सरकारने करावे, अशी शिफारस करण्यात येणार असल्याचे त्यांनी येथे पत्रकारांना सांगितले.
[/EPSB]