मुसळधार पावसामुळे राजस्थानमधील जनजीवन विस्कळीत झाले असून माउंट अबूमध्ये दोन हजार पर्यटक अडकले आहेत.
माउंट अबू- राजस्थानमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पडणा-या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. माउंट अबू येथे दोन हजार पर्यटक अडकल्याचे वृत्त आहे.
पावसामुळे या भागात भुस्खलन झाल्याने येथील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. राजस्थानमधील पावसाने सहा जणांचा बळी घेतला असून
जिल्ह्यातील सगळ्या धरणांनी धोक्याची पातळी गाठली असून राजस्थानच्या जालोर आणि सिरोहीमध्ये पूरस्थिती कायम आहे. गेल्या २४ तासांत २०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याचे राज्याचे मुख्य सचिव (आपत्कालीन विभाग) हेमंत गेरा यांनी सांगितले.
पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सैन्याचे जवान, एनडीआरएफ, सीआरडीएफ, भारतीय वायू दल आणि राष्ट्रीय आपत्कालीन विभाग अहोरात्र कार्यरत असल्याचे जालोरचे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण सोनी यांनी सांगितले.