नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन भाजपाशी हातमिळवणी केल्याने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार हल्ला चढविला आहे. नितिशकुमार दगाबाज आहेत असे म्हणत राहुल गांधींनी त्यांच्यावर घणाघात केला.
नवी दिल्ली- नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन भाजपाशी हातमिळवणी केल्याने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार हल्ला चढविला आहे. नितिशकुमार दगाबाज आहेत असे म्हणत राहुल गांधींनी त्यांच्यावर घणाघात केला.
बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर २४ तासाच्या आत नितिशकुमार पुन्हा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. यासंदर्भात राहुल गांधी प्रसार माध्यमांशी बोलत असताना त्यांनी नितिशकुमार यांच्यावर जोरदार टीका केली.
नितिशकुमार यांनी मोठा धोका दिला. त्यांच्याबरोबर भेट झाली तेव्हाच कळाले की त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळे राजकारण सुरू आहे. हे तीन-चार महिन्यांपुर्वीच लक्षात आले असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
नितीश कुमार युपीए सोडून एनडीएमध्ये सामिल झाले, त्याबद्दल विचारले असता ‘भारताच्या राजकारणाची हीच शोकांतिका आहे. आपल्या स्वार्थासाठी एखादी व्यक्ती काहीही करु शकते, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.