काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि अमेठीचे खासदार राहुल गांधी यांना मिळणा-या खासदार निधीला ब्रेक लागला आहे. राहुल यांना खासदार निधी उपलब्ध होत नसल्याने अमेठी मतदारसंघातील कामे पैशांअभावी रखडली आहेत.
लखनऊ- काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि अमेठीचे खासदार राहुल गांधी यांना मिळणा-या खासदार निधीला ब्रेक लागला आहे. राहुल यांना खासदार निधी उपलब्ध होत नसल्याने अमेठी मतदारसंघातील कामे पैशांअभावी रखडली आहेत. राहुल गांधी यांच्या खासदार निधीच्या खात्यात शेवटचा निधी २०१५-१६ मध्ये जमा झाला होता. तेव्हापासून या खात्यात एकही पैसा जमा झाला नाही. खात्यात पैसा जमा का होत नाही हे विचारण्यासाठी तत्कालीन जिल्हा प्रशासनाने प्रयत्न केले; परंतु अद्याप त्याला उत्तर मिळाले नाही. राहुल गांधी यांच्या खासदार निधीला ब्रेक लागला असल्याने, त्यांच्या मतदारसंघातील प्रस्तावित कामे रखडली असल्याचा आरोप जिल्हा काँग्रेस समितीने केला आहे.
खासदार निधीअंतर्गत पावणे पाच कोटींच्या कामांना मान्यता मिळाली आहे. यामध्ये ४६३ संपर्क मार्ग, सोलर प्लॉण्ट, प्रवासी प्रतीक्षालय, शाळांचे
नूतनीकरण यासारख्या कामांचा समावेश आहे. अमेठी मतदारसंघात तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. यातील अमेठीचा मोठा भाग आहे. तर सुलतानपूर आणि रायबरेलीमधील काही भागाचा समावेश आहे. केंद्र सरकारकडून मिळणारा खासदार निधी हा पहिला अमेठीला जातो. त्यानंतर अन्य जिल्ह्यांकडे वळवला जातो. खासदार निधी म्हणून वर्षाला ५ कोटी रुपये मिळतात. जिल्हा प्रशासनाला थेट केंद्राकडून पैसा मिळतो.
विकासकाम पूर्ण झाल्यानंतर प्रशासन केंद्र सरकारला प्रमाणपत्र पाठवतात. त्यानंतर निधीचा पुढील हप्ता केंद्र सरकार पाठवते. ‘जे झाले ते आधीच्या सरकारच्या काळात झाले. आचारसंहितेच्या काळात निधी दिला जात नाही. आतापर्यंत निधी आला नाही. आम्ही यूसी पाठवली आहे. लवकरच निधी मिळेल,’ अशी माहिती अमेठीचे जिल्हाधिकारी योगेश कुमार यांनी दिली. तर ज्या-ज्या ठिकाणी भाजपचे सरकार आहे, त्या-त्या ठिकाणी काँग्रेस खासदारांना अशा अडचणी येत असल्याचा आरोप उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर यांनी केला आहे.
[EPSB]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या, अहमदाबाद-मुंबई‘बुलेट ट्रेन’ची पायाभरणी अहमदाबादमध्ये गुरुवारी झाली.
[/EPSB]