गुजरात दौ-यावर असलेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
अहमदाबाद- गुजरात दौ-यावर असलेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. नरेंद्र मोदींनी शेतक-यांपेक्षा जास्त पैसे टाटांच्या नॅनो प्रकल्पासाठी दिल्याचा आरोप त्यांनी केला. माध्यमांना मोदी सरकारविरोधात लिहायचेय पण त्यांना धमकावले जाते आणि मारहाण केली जाते, असा दावाही त्यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी सोमवारी अहमदाबादमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या गुजरात दौ-याला महत्त्व प्राप्त झाले आहे. मोदींच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींनी भाजपवर टीकास्त्र सोडले.
मोदींनी शेतक-यांपेक्षा दुप्पट पैसे टाटांच्या नॅनो प्रकल्पासाठी दिले, असे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसमधील पक्षांतर्गत नाराजीवर त्यांनी भाष्य केले. संघ आणि भाजपविरोधात लढणा-या कार्यकर्त्यांनाच आम्ही निवडणुकीत तिकीट देणार, असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसमध्ये असूनही पक्षाच्या पराभवासाठी प्रयत्न केला तर त्यांना आमच्या पक्षात जागा नसेल, असा इशाराही त्यांनी पक्षविरोधी काम करणा-यांना दिला. देशात हुकूमशाही असल्याचा आरोप करत राहुल गांधी म्हणाले, देशात माध्यमांची गळचेपी होत आहे.
सरकारविरोधात भूमिका घेणा-या माध्यमांना धमकी दिली जाते. शेतकरी, छोटे व्यापारी आणि कामगार हे माध्यम चालवत नाही. तर मोदींचे तीन-चार मित्र माध्यमे चालवतात, असा टोलाही त्यांनी लगावला. आम्ही सरकारला वस्तू आणि सेवाकरात चार टप्पे ठेवण्याऐवजी १८ टक्क्य़ांची मर्यादा ठेवा असे सांगितले होते. पण याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचे गांधी म्हणाले.
[EPSB]
जेटलींच्या दौ-यानंतर सीतारामन यांना पदभार
[/EPSB]