दिल्लीला वायू प्रदूषणापासून वाचवण्यासाठी आणि यापूर्वी न्यायालयाने दिलेल्या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे.
नवी दिल्ली- वायू प्रदूषणाने दिल्लीचे ‘सार्वजनिक आरोग्य’ धोक्यात आले आहे. दिल्लीला वायू प्रदूषणापासून वाचवण्यासाठी आणि यापूर्वी न्यायालयाने दिलेल्या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी याचिका दाखल झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर, न्या. धनंजय चंद्रचूड व न्या. एल. नागेश्वर राव यांच्या पीठाकडे तातडीने सुनावणीची मागणी काही वकिलांनी व पर्यावरण प्रदूषण प्राधिकरणाच्या सदस्यांनी सोमवारी केली.
ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ सुनीता नरेन यांनी सांगितले की, दिल्लीत गेल्या १७ वर्षात पहिल्यांदाच प्रदूषणाचे दाट धुके पसरले आहेत. त्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. घातक वायू प्रदूषण रोखण्यासाठी न्यायालयाने आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
१५ वर्षावरील डिझेल वाहनांना, फटक्यांना बंदी
१५ वर्षावरील जुनी डिझेल वाहने, फटाके फोडण्यास दिल्ली सरकारने बंदी घातली आहे. याबाबतचे आदेश दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी दिले.