शिवसेनेचे वय ५० वर्षे झाले असले तरी त्यांचे वर्तन पाच वर्षाच्या बालकाप्रमाणे होत आहे. नाईट लाईफ, ओपन जिमपाठोपाठ आता पेंग्विनचा बालहट्ट पुरवला जात आहे.
मुंबई- शिवसेनेचे वय ५० वर्षे झाले असले तरी त्यांचे वर्तन पाच वर्षाच्या बालकाप्रमाणे होत आहे. नाईट लाईफ, ओपन जिमपाठोपाठ आता पेंग्विनचा बालहट्ट पुरवला जात आहे. जनतेच्या पैशांतून असले बालहट्ट पुरवले जाऊ नयेत, असा टोला काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी लगावला.
भायखळा येथील वीर जिजामाता उद्यानात पेंग्विन आणण्यात आले आहेत. त्याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता नितेश राणे म्हणाले की, ‘मुंबईच्या वातावरणात पेंग्विन जगतील की नाही हा खरा प्रश्न असून याबाबत आधी अभ्यास करण्याची गरज होती.
मात्र बालहट्टासमोर झुकून हा निर्णय घेण्यात आला. पेंग्विन मुंबईत जगणे अवघड असल्याने उद्या त्यांचे काही बरेवाईट झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेईल, असा प्रश्न नितेश यांनी उपस्थित केला.