‘पोलिसांवर हल्ल्यांचे प्रकार थांबता थांबत नाहीत. कायद्याचा कुणावर धाकच न राहिल्यामुळे आता ऊठसूठ असे हल्ले होत आहेत.
मुंबई- ‘पोलिसांवर हल्ल्यांचे प्रकार थांबता थांबत नाहीत. कायद्याचा कुणावर धाकच न राहिल्यामुळे आता ऊठसूठ असे हल्ले होत आहेत. यापुढे हे हल्ले असेच सुरू राहिले तर माझे स्वाभिमानी कार्यकत्रे पोलिसांवर हल्ले करणा-यांच्या विरोधात कायदा हातात घेतील, असा इशारा काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारला दिला.
‘आता बस्स! पोलीस संघटना झालीच पाहिजे’ असे ट्विट राणे यांनी करताच बुधवारी ‘स्वाभिमान’च्या कार्यकर्त्यांनी, मंगळवारी विलेपाल्रे येथे महिला कॉन्स्टेबलला मारहाण करणा-या आरोपी आरती पाटलेकर आणि तिच्या भावाला अंधेरी कोर्टाबाहेर आणताच त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न करून जोरदार घोषणाबाजी केली.
वाहतूक पोलीस विलास शिंदे एका प्राणघातक हल्ल्यात मरण पावले. महिला कॉन्स्टेबल प्रियांका खोत यांना आरती पाटलेकर यांनी मारहाण केली. पोलिसांची संघटना झालीच पाहिजे. पोलिसांवर हल्ले करणा-यांविरुद्ध कठोर कारवाई व्हायलाच हवी, अशा घोषणा देत या कार्यकर्त्यांनी पोलिसांना आपला पाठिंबा दर्शविला.