गेल्या वर्षी पालिका कर्मचा-यांना १४ हजार रुपये बोनस देण्यात आला होता. यंदा कर्मचा-यांना वेतनाच्या सरासरी २० टक्के म्हणजे ४० हजार रुपये बोनस मिळावा अशी मागणी कामगार संघटनांकडून करण्यात आली आहे.
मुंबई- गेल्या वर्षी पालिका कर्मचा-यांना १४ हजार रुपये बोनस देण्यात आला होता. यंदा कर्मचाऱ्यांना वेतनाच्या सरासरी २० टक्के म्हणजे ४० हजार रुपये बोनस मिळावा अशी मागणी कामगार संघटनांकडून करण्यात आली आहे. कर्मचा-यांच्या बोनस प्रश्नावर शनिवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी गटनेत्यांची बैठक आयोजित केली होती. पण तोडगा काही निघू शकला नाही. त्यामुळे बोनसचा प्रश्न तूर्तास अनिर्णितच आहे.
बोनसबाबत महापौरांच्या मध्यस्थीने प्रशासनाबरोबर शनिवारी झालेल्या चर्चेतून तोडगा निघू शकला नाही. वस्तू आणि सेवा कर, बंद झालेला जकात कर आणि नोटाबंदीमुळे गतवर्षीइतका बोनस देणे शक्य नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे कर्मचा-यांचा बोनस प्रश्न शनिवारी अनिर्णित राहिला असून आता याबाबत सोमवारी निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, सत्ताधारी शिवसेनेला बोनसचे श्रेय मिळू नये यासाठी भाजपची खटपट सुरू झाली असून कर्मचा-यांचा बोनस प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने सोडविण्याची व्यूहरचना भाजपकडून करण्यात येत असल्याचे समजते.
गेल्या वर्षी पालिका कर्मचा-यांना १४ हजार रुपये बोनस देण्यात आला होता. यंदा कर्मचाऱ्यांना वेतनाच्या सरासरी २० टक्के म्हणजे ४० हजार रुपये बोनस मिळावा अशी मागणी कामगार संघटनांकडून करण्यात आली आहे. कर्मचा-यांच्या बोनस प्रश्नावर शनिवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पुढाकार घेऊन सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक आयोजित केली होती. दिवाळीनिमित्त कर्मचा-यांना बोनस देण्याची तयारी अजोय मेहता यांनी दर्शविली. मात्र बंद झालेला जकात कर, वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी आणि नोटाबंदी आदी विविध कारणे पुढे करीत कर्मचाऱ्यांना गतवर्षीइतका बोनस देणे शक्य नसल्याचे अजोय मेहता यांनी स्पष्ट केले. कर्मचा-यांना नेमका किती बोनस द्यावा यावर एकवाक्यता होऊ न शकल्याने आता सोमवारी हा तिढा सोडविण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे.
दरवर्षी महापौरांच्या मध्यस्थीने बोनसच्या वाटाघाटी पूर्ण करून त्याची घोषणा केली जाते. यंदा कर्मचा-यांना देण्यात येणा-या बोनसचे श्रेय शिवसेनेला मिळू नये यासाठी भाजपकडून व्यूहरचना आखण्यात येत असल्याचे समजते. बोनस प्रश्नाच्या वाटाघाटी मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने करण्याचा विचार काही भाजप नेते करीत आहेत.
[EPSB]
छात्र भारती’ या विद्यार्थी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व बाबा आमटे यांचे ज्येष्ठ सहकारी डॉ. मुरलीधर शहा यांचे रविवारी पहाटे निधन झाले. ते ८० वर्षाचे होते. त्यांच्या निधनाने समाजवादी चळवळीचा आधारस्तंभ गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
[/EPSB]