मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम कंत्राटदार बदलूनही पूर्ण होत नसल्याने राज्याचे गृहनिर्माणमंत्री तसेच रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, कामाच्या लवकर पूर्ततेसाठी या महामार्गाचे काम केंद्र सरकारने करावे, अशी शिफारस करण्यात येणार असल्याचे त्यांनी येथे पत्रकारांना सांगितले.
अलिबाग- मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम कंत्राटदार बदलूनही पूर्ण होत नसल्याने राज्याचे गृहनिर्माणमंत्री तसेच रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, कामाच्या लवकर पूर्ततेसाठी या महामार्गाचे काम केंद्र सरकारने करावे, अशी शिफारस करण्यात येणार असल्याचे त्यांनी येथे पत्रकारांना सांगितले.
मेहता यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा आढावा रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला, त्यानंतर त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. गेल्या सहा वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले आहे. सुरुवातीस हे काम सुप्रीम कंपनीकडे होते. त्यांनी ते काम निर्धारित वेळेत पूर्ण केले नाही. जे काम झाले आहे, त्याचा दर्जा निकृष्ट आहे.
सुप्रीम कंपनीकडून ते काम काढून घेतल्यानंतर हे काम जे. एम. म्हात्रे इन्फ्राकंपनी यांना देण्यात आले. मात्र त्यांच्याकडूनही काम रखडले आहे, अशी समस्याही त्यांनी मांडली. महामार्गाच्या कामाबाबत लवकरच मंत्रालय स्तरावर एक बैठक घेण्यात येईल. त्या बैठकीमध्ये कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणे, कामाबाबत वेळ ठरवून घेणे, त्याचबरोबर मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरच मार्गी लागावे, यासाठी हे काम केंद्र सरकारकडे वर्ग करण्याबाबत शिफारस करणार असल्याचे मेहता यांनी सांगितले.
[EPSB]
वस्तू आणि सेवा कर परिषदेत घेतलेल्या नव्या निर्णयामुळे यंदा दिवाळी लवकर आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले होते. मोदींच्या या विधानाचा काँग्रेसने जोरदार समाचार घेतला आहे.
[/EPSB]