ज्या गृहनिर्माण संस्था व कंपन्या दररोज १०० किलोपेक्षा जास्त कचरा करतात त्यांचा कचरा दोन ऑक्टोबरपासून उचलला जाणार नाही, असा नियम महापालिकेने केला आहे.
मुंबई- ज्या गृहनिर्माण संस्था व कंपन्या दररोज १०० किलापेक्षा जास्त कचरा करतात त्यांचा कचरा दोन ऑक्टोबरपासून उचलला जाणार नाही, असा नियम महापालिकेने केला आहे. या संस्थांनी आपल्या कच-याची प्रक्रिया सोसायटीच्या, कंपनीच्या आवारातच करावी, अन्यथा घनकचरा व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे. मागील चाळीसहून अधिक वर्ष सुमारे दीड कोटी मुंबईकरांचा कचरा सामावून घेणा-या देवनार डम्पिंग ग्राऊंडची क्षमता संपली आहे. हे डम्पिंग बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे शास्त्रीय पद्धतीने डम्पिंग बंद करण्याची प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. मात्र तत्पूर्वी मुंबईतील ओला आणि सुका कचरा वर्गीकरणाचे प्रयत्न पालिकेने सुरू केले आहेत. या
प्रयत्नांचा एक भाग म्हणून ज्या सोसायटीच्या आवारात रोज १०० किलोपेक्षा जास्त कचरा गोळा होतो त्यांचे नियमन करण्याचे पालिकेने ठरवले आहे. याची माहिती पालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने घन कचरा प्रक्रिया व साधने या वरळी येथे भरवण्यात आलेल्या प्रदर्शनात देण्यात आली. या प्रदर्शनात घन कचरा प्रक्रिया व साधनांची निर्मिती करणा-या ७५ पेक्षा जास्त कंपन्यांनी सहभाग घेतला असून या प्रदर्शनात घन कचरा प्रक्रियेमध्ये ओला व सुका कचरा तसेच इतर महत्त्वपूर्ण बाबींची माहिती देण्यात आली आहे.
[EPSB]
शांततेसाठी सर्व देशांमध्ये सहकार्य आवश्यक
[/EPSB]